पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यपन मृतावस्थेत आढळले

श्रीरंगपट्टन : कर्नाटकमधील प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह श्रीरंगपट्टनच्या साई आश्रमाजवळील कावेरी नदीत आढळला.


अय्यप्पन पत्नीसह म्हैसूरच्या विश्वेश्वरा नगर औद्योगिक क्षेत्रात राहत होते. ते ७ मे पासून बेपत्ता होते. घरच्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलीस तपास सुरू असताना नदीतून वाहत एक मृतदेह किनाऱ्यालगत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह बघून पोलिसांनी अय्यप्पन कुटुंबाशी संपर्क साधला. अय्यप्पन कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह बघून ओळख पटवली. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.


पोलिसांनी पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यपन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपास सुरू केला आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांनी आत्महत्या केली की त्यांना कोणीतरी पाण्यात ढकलून दिले याचा तपास पोलीस करत आहेत.


डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांनी मत्स्यव्यवसायात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले होते. राष्ट्रीय स्तरावर अनेक उच्च पदांवर काम केले होते. भारताच्या नीलक्रांतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन २०२२ मध्ये गौरव करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने