मुंबईतील एक लाख गरजूंना मिळणार मोफत जेवण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो नागरिक उपचाराकरिता येतात. अशा रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब आणि बालक यांची देखील भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्यच्या वतीने दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते.


मुंबईतील 'अक्षय चैतन्य' या सेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई पोर्ट अथॉरिटीने भायखळा येथील घोडपदेव येथे ३०,००० चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे, ज्याठिकाणी भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वांत अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर विकसित केले जाणार आहे.


या अत्याधुनिक किचनमध्ये दररोज १,००,००० गरजूंना पौष्टिक आहार पुरवण्याची क्षमता असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मुंबई पोर्ट अथॉरिटीचे मुख्य अग्निशमन अधिकारी इंद्रजित बड्डा, मुंबई पोर्ट अथॉरिटीचे इस्टेट मॅनेजर जी. ए. शिरसाट मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचे दिलीप शेडकर टीएलसी लीगलचे मॅनेजींग पार्टनर विपिन जैन, व्हीव्हीएफ ग्रुपचे सीएमडी रुस्तम गोदरेज जोशी, महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय शेडे आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे अमित नबीरा आदी या उपक्रमाला उपस्थित होते.

Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ