मुंबईतील एक लाख गरजूंना मिळणार मोफत जेवण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो नागरिक उपचाराकरिता येतात. अशा रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब आणि बालक यांची देखील भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्यच्या वतीने दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते.


मुंबईतील 'अक्षय चैतन्य' या सेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई पोर्ट अथॉरिटीने भायखळा येथील घोडपदेव येथे ३०,००० चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे, ज्याठिकाणी भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वांत अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर विकसित केले जाणार आहे.


या अत्याधुनिक किचनमध्ये दररोज १,००,००० गरजूंना पौष्टिक आहार पुरवण्याची क्षमता असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मुंबई पोर्ट अथॉरिटीचे मुख्य अग्निशमन अधिकारी इंद्रजित बड्डा, मुंबई पोर्ट अथॉरिटीचे इस्टेट मॅनेजर जी. ए. शिरसाट मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचे दिलीप शेडकर टीएलसी लीगलचे मॅनेजींग पार्टनर विपिन जैन, व्हीव्हीएफ ग्रुपचे सीएमडी रुस्तम गोदरेज जोशी, महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय शेडे आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे अमित नबीरा आदी या उपक्रमाला उपस्थित होते.

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या