मुंबईतील एक लाख गरजूंना मिळणार मोफत जेवण

  39

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो नागरिक उपचाराकरिता येतात. अशा रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब आणि बालक यांची देखील भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्यच्या वतीने दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते.


मुंबईतील 'अक्षय चैतन्य' या सेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई पोर्ट अथॉरिटीने भायखळा येथील घोडपदेव येथे ३०,००० चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे, ज्याठिकाणी भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वांत अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर विकसित केले जाणार आहे.


या अत्याधुनिक किचनमध्ये दररोज १,००,००० गरजूंना पौष्टिक आहार पुरवण्याची क्षमता असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मुंबई पोर्ट अथॉरिटीचे मुख्य अग्निशमन अधिकारी इंद्रजित बड्डा, मुंबई पोर्ट अथॉरिटीचे इस्टेट मॅनेजर जी. ए. शिरसाट मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचे दिलीप शेडकर टीएलसी लीगलचे मॅनेजींग पार्टनर विपिन जैन, व्हीव्हीएफ ग्रुपचे सीएमडी रुस्तम गोदरेज जोशी, महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय शेडे आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे अमित नबीरा आदी या उपक्रमाला उपस्थित होते.

Comments
Add Comment

रस्‍त्‍याची चाळण झाल्‍याचे दिसल्‍यास कडक कारवाई होणार, बीएमसी आयुक्तांचा इशारा

मुंबई : महानगरपालिकेने रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून कंत्राटदार

वादळी पावसाचा इशारा ! महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी, पुढील ४८

रेल्वेत विसरलेले सोन्याचे दागिने मिळाले!

मुंबई : एका महिलेची लोकल ट्रेनमध्ये राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग वडाळा रेल्वे पोलिसांनी शोधून परत

POP Ganesh Idols : महत्वाची बातमी! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मूर्तिकार अन् मंडळांना मोठा दिलासा मुंबई : गणेशभक्तांसाठी आणि मूर्तिकारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.

Mumbai Local Train Accident: "बाहेरच्या लोंढ्यांमुळं मुंबईची रेल्वे सेवा कोलमडली": राज ठाकरे

मुंबई: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलच्या गाडीतून ८ ते १२ प्रवासी रेल्वे रुळावर पडल्याची

घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला; भाषिक वाद पुन्हा पेटणार!

मुंबई : घाटकोपरमधल्या रायगड चौकात एका मराठी कुटुंबावर घरात घुसून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.