दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९४.१० टक्के; कोकणचे ९८.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) दहावीच्या शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ चा निकाल आज म्हणजेच मंगळवार १३ मे २०२५ रोजी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना निकाल मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्य्पासून ऑनलाईन बघता येईल. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात यंदा दहावीची परीक्षा दिलेल्यांपैकी ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाात १.७१ टक्के घट झाली. विभागनिहाय निकालांमध्ये पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागातून ९८.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्हानिहाय निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कमाल केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९९. ३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यातील २११ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. या वर्षी १५ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.

माध्यमिक शालांत परीक्षा एकून ६२ विषयांसाठी घेण्यात आली होती त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यात ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त आणि ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवून ४ लाख ९७ हजार २७७ जण उतीर्ण झाले आहेत. राज्यात ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत म्हणजे ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पण ६० टक्यांपेक्षा कमी गुण मिळवून उत्तीर्ण झाले. एकूण ८६ हजार ६४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची संधी आहे. यंदा फेरपरीक्षेचा अर्ज १५ मे २०२५ पासून भरण्यास सुरुवात होईल आणि परीक्षा २४ जूनपासून सुरु होईल.

निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून बघता येईल.

विभागनिहाय कामगिरी

कोकण: ९८.८२ टक्के
कोल्हापूर: ९६.८७ टक्के
मुंबई: ९५.८४ टक्के
पुणे: ९४.८१ टक्के
नाशिक: ९३.०४ टक्के
अमरावती: ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.८२ टक्के
लातूर: ९२.७७ टक्के
नागपूर: ९०.७८ टक्के
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली