काश्मीर हा भारताचाच भाग आहे; कुठलीही मध्यस्थी मान्य नाही; भारताने पाकिस्तानला ठणकावले

भारताची ठाम भूमिका – तिसऱ्या पक्षाची गरज नाही, काश्मीर आमचाच!


नवी दिल्ली : “काश्मीर हे भारताचे केंद्रशासित क्षेत्र आहे आणि त्यावर कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीला भारत संमती देणार नाही,” अशा ठाम शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा जगाला भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानच्या अलीकडील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले की, “भारत आणि पाकिस्तानमधील सर्व प्रश्न हे केवळ द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जातील.”


जयस्वाल म्हणाले, “दहशतवाद पोसणाऱ्या देशाला वाटतं की तो यातून मोकळा होईल, तर ती भ्रमाची दुनिया आहे. भारताने नष्ट केलेली दहशतवादी केंद्रे ही जगभरातील निष्पाप लोकांच्या मृत्यूस जबाबदार होती. पाकिस्तानने हे जितकं लवकर समजून घेतलं, तितकं चांगलं!”


ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणं हाच खरा मुद्दा आहे. आम्ही कोणत्याही दबावाला किंवा हस्तक्षेपाला भीक घालत नाही.”


दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या चर्चांमध्ये व्यापाराचा कोणताही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात