काश्मीर हा भारताचाच भाग आहे; कुठलीही मध्यस्थी मान्य नाही; भारताने पाकिस्तानला ठणकावले

भारताची ठाम भूमिका – तिसऱ्या पक्षाची गरज नाही, काश्मीर आमचाच!


नवी दिल्ली : “काश्मीर हे भारताचे केंद्रशासित क्षेत्र आहे आणि त्यावर कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीला भारत संमती देणार नाही,” अशा ठाम शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा जगाला भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानच्या अलीकडील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले की, “भारत आणि पाकिस्तानमधील सर्व प्रश्न हे केवळ द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जातील.”


जयस्वाल म्हणाले, “दहशतवाद पोसणाऱ्या देशाला वाटतं की तो यातून मोकळा होईल, तर ती भ्रमाची दुनिया आहे. भारताने नष्ट केलेली दहशतवादी केंद्रे ही जगभरातील निष्पाप लोकांच्या मृत्यूस जबाबदार होती. पाकिस्तानने हे जितकं लवकर समजून घेतलं, तितकं चांगलं!”


ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणं हाच खरा मुद्दा आहे. आम्ही कोणत्याही दबावाला किंवा हस्तक्षेपाला भीक घालत नाही.”


दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिका आणि भारत यांच्यात झालेल्या चर्चांमध्ये व्यापाराचा कोणताही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली