आयात शुल्कावरुन अमेरिका आणि भारत यांच्यातील वाद चिघळला

नवी दिल्ली : अमेरिकेने भारताच्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क अर्थात टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात भारताने जागतिक व्यापार संघटनेकडे नाराजी नोंदवली आहे. तसेच भारताने अमेरिकेच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेकडे पाठवला आहे.

अमेरिकेने देशाच्या सुरक्षेचे कारण देत स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क लागू केले आहे. पण या निर्णयामुळे भारत अमेरिकेला निर्यात करत असलेल्या ७७.६ अब्ज डॉलरच्या मालाच्या किंमतीत वाढ होणार आहे. भारतीय उत्पादनांवर थेट १.९१ अब्ज डॉलरचा भार पडणार आहे. भारताच्या निर्यात व्यापारात घट होण्याचा धोका आहे. यामुळे भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचा आधार घेतला आहे. भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेकडे आयात शुल्कांचा नवा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार अमेरिकेच्या निर्णयाला उत्तर म्हणून देशहिताच्या रक्षणासाठी भारत अमेरिकेच्या निवडक उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून नुकसान भरपाई वसूल करणार आहे.

याआधी २०१८ मध्ये अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियम संदर्भातले स्वतःचे आयात धोरण बदलले होते. त्यावेळी भारताने नुकसान भरपाईसाठी अमेरिकेतून भारतात येणाऱ्या २८ उत्पादनांवर वाढीव आयात शुल्क अर्थात टॅरिफ लागू केले होते.
Comments
Add Comment

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Latur Viral Video : वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना

Pratap Sarnaik : आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार. पंढरपूर :- आषाढी यात्रेच्या

ICC Hall of Fame : सौरव गांगुली आणि अंजुम चोप्राचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज, माजी पुरुष कर्णधार सौरव गांगुली आणि माजी