India Pakistan: आता आम्ही दहशतवादासोबतचे सर्व नाते तोडले, पंतप्रधान मोदींच्या गर्जनेनंतर घाबरला पाकिस्तान

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबच्या आदमपूर एअरबेस येथून दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला थेट शब्दात उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे म्हटले की ऑपरेशन सिंदूर केवळ सध्या स्थगित करण्यात आलेले आहे. याला पूर्णपणे बंद करण्यात आलेले नाही. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की पाकिस्तान कोणती भूमिका घेतयं याच्यावर त्यांना मापले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.



आता आम्ही दहशतवादासोबतचे सर्व नाते तोडले


जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफने म्हटले की पाकिस्तानने दहशतवादाशी सर्व नाते तोडले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्‍यांनी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले, जगातील इतर देशांनी येथे येऊन तपासावे की येथे दहशतवादी कँप आहे की नाही. आम्ही दहशतवादाशी अनेक वर्षांपूर्वी आपले नाते तोडले आहे.



दहशतवादाच्या ठिकाणांवर प्रहार करणार भारत- पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशाला संबोधित करताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला. ते म्हणाले, कोणत्याही प्रकारचे अण्वस्त्र ब्लॅकमेल देश सहन करणार नाही. न्यूक्लियर धमकीच्या आड दहशतवादी ठिकाणांवर भारत थेट आणि निर्णायक प्रहार करेल. भारताची तीनही दले, आमचे एअऱफोर्स, आमचे लष्कर, आमचे नौदल, संरक्षक दल, भारताचे अर्धसैनिक बल सातत्याने अलर्टवर आहेत.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने