दहावीचा निकाल आज, दुपारी १ वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

  36

पुणे (प्रतिनिधी) : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून मंगळवारी, दि. १३ मे रोजी दुपारी १ वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे.


निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यात निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्व माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. ५ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल लागला होता. तेव्हापासून दहावीच्या निकालाकडे विद्याथ्यचि डोळे लागले होते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल १५ मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण रकितस्थळांवरून उपलब्ध होतील, निकालाची प्रत देखील घेता येईल.



या संकेतस्थळांवर मिळेल अतिरिक्त माहिती


www.mahresult.nic. in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard. in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार असून निकालाबाबतचा अन्य तपशील उपलब्ध होईल.



गुणांची पडताळणीही करता येणार


निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयात विद्यार्थ्याला गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किsया स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल, हा अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://ssc_student.mahahsscboard.in/ यावर करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी १४ मे ते २८ मे पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे, तर पुरवणी परीक्षेसाठी १५ मेपासून अर्ज भरता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले