Virat Kohli : निवृत्तीनंतर विराट आता देश सोडून जातोय का? विमानतळावरचा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तब्बल १४ वर्षांनंतर विराटने हा मोठा निर्णय घेतला असून, त्याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. यानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.


विमानतळावरील त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी विचारलंय – "विराट आता देश सोडून जातोय का?", तर काही जण भावूकही झाले आहेत.


कसोटीमधून निवृत्ती आणि अनुष्काचं सिनेमापासून अंतर, या दोन्ही गोष्टी पाहता, काही नेटकऱ्यांनी अंदाज वर्तवला की हे दोघं कायमचं परदेशात स्थायिक होणार का?



एका युजरने लिहिलंय की, “वहिनी थांबा… दादालाही थांबवा!” तर दुसऱ्याने विचारलं – “गाडीत बसून निवृत्ती घेतली आणि आता थेट देश सोडून चाललात का?”


अलीकडच्या काळात हे दोघं बराचसा वेळ परदेशातच राहताना दिसले. वामिका आणि अकाय या दोन मुलांसोबत त्यांचं लंडनमध्ये स्थायिक होणं चर्चेत आहे.


काही दिवसांपूर्वी विराट सोशल मीडियावरही चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्या अकाऊंटवरून अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅनपेजला लाईक मिळालं होतं. नंतर त्याने इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे झालं, असं स्पष्टीकरण दिलं.


या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधून एक युग संपलं, पण त्याचा वैयक्तिक आयुष्य अजूनही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.




Comments
Add Comment

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दिशा वकानीच्या वडिलांचं निधन

मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ओळखली

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर

Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील 'फिल्टर पाड्याचा बच्चन' गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : आपल्या कॉमेडीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा त्याचबरोबर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून