Virat Kohli : निवृत्तीनंतर विराट आता देश सोडून जातोय का? विमानतळावरचा व्हिडिओ चर्चेत

  38

मुंबई : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तब्बल १४ वर्षांनंतर विराटने हा मोठा निर्णय घेतला असून, त्याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. यानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.


विमानतळावरील त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी विचारलंय – "विराट आता देश सोडून जातोय का?", तर काही जण भावूकही झाले आहेत.


कसोटीमधून निवृत्ती आणि अनुष्काचं सिनेमापासून अंतर, या दोन्ही गोष्टी पाहता, काही नेटकऱ्यांनी अंदाज वर्तवला की हे दोघं कायमचं परदेशात स्थायिक होणार का?



एका युजरने लिहिलंय की, “वहिनी थांबा… दादालाही थांबवा!” तर दुसऱ्याने विचारलं – “गाडीत बसून निवृत्ती घेतली आणि आता थेट देश सोडून चाललात का?”


अलीकडच्या काळात हे दोघं बराचसा वेळ परदेशातच राहताना दिसले. वामिका आणि अकाय या दोन मुलांसोबत त्यांचं लंडनमध्ये स्थायिक होणं चर्चेत आहे.


काही दिवसांपूर्वी विराट सोशल मीडियावरही चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्या अकाऊंटवरून अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅनपेजला लाईक मिळालं होतं. नंतर त्याने इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे झालं, असं स्पष्टीकरण दिलं.


या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधून एक युग संपलं, पण त्याचा वैयक्तिक आयुष्य अजूनही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.




Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल