कोलंबो येथील तिरंगी मालिकेवर भारतीय महिला संघाचा कब्जा

यजमान श्रीलंकन महिला संघाचा ९७ धावांनी पराभव


कोलंबो : कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. भारतीय फलंदाज स्मृती मानधनाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३४२ धावा केल्या. श्रीलंकन महिला संघाला अवघ्या २४५ धावाच करता आल्या. अखेर भारताने ९७ धावांनी हा सामना जिंकत विजेतेपदावर कब्जा करत आपले नाव कोरले. भारताच्या ३४३ धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या श्रीलंकन महिला संघाला पहिल्याच षटकात मोठा झटका बसला. हंसिनी पेरेराला अमनज्योत कौरने त्रिफळाचित करत तंबूत धाडले. त्यानंतर विष्मी गुणरत्ने आणि चमारी अटापट्टू जोडीने ६८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र ही भागीदारी कौरने तोडली. तिने गुणरत्नेला त्रिफळाचित करत ३६ धावांवर माघारी धाडले. चमारीने डीसील्व्हा सोबत संघाचा धावफलक हलता ठेवत ५३ धावांची भागीदारी केली.


अखेर स्नेह राणाने दोन्ही फलंदाजांना माघारी धाडले. चमारी अटापट्टूने ५१, तर डीसील्व्हाने ४८ धावा केल्या. त्यानंतर विहंगा, बडांगे हे श्रीलंकन संघांचे खेळाडू स्वस्त्यात माघारी परतले. अनुष्का संजीवनीने सुगंदिका कुमारीसोबत ५१ धावांची भागीदारी करत श्रीलंकन संघाला विजयाच्या आशा दाखवल्या. मात्र श्रीलंकन संघाच्या या आशेवर भारतीय महिला गोलंदाजांनी पाणी फेरले. संपूर्ण श्रीलंकन संघ ५० षटकेही पूर्ण खेळू शकला नाही. २४५ धावांत त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले. भारतीय महिला संघाने ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाकडून स्नेह राणाने ४ तर अमनज्योत कौरने ३ गडी बाद केले. तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर मानधना आणि प्रतीक रावल यांनी सावध सुरुवात केली आणि पहिल्या ५ षटकांत फक्त १४ धावा केल्या. तथापि, नंतर त्याने धावांचा वेग वाढवला. रावल बाद होण्यापूर्वी दोघांनी ७० धावा जोडल्या. त्यानंतर मंधानाला हरलीन देओलच्या रूपात आणखी एक मजबूत जोडीदार मिळाला, दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावा जोडल्या. दरम्यान, ५० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर मानधना आक्रमक दिसली.


भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटने सामन्यात महत्वाच्या धावा आल्या. हरमनप्रीत कौर हिने संघासाठी ३० चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यामध्ये तिने यामध्ये तिने १ षटकार आणि ४ चौकार मारले. रिचा घोष मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली तिने आजच्या सामन्यात ९ चेंडू खेळले आणि ८ धावा करून बाद झाली. स्मृती मानधना हिने संघासाठी १०१ चेंडूंमध्ये ११६ धावा केल्या. यामध्ये तिने २ षटकार आणि १५ चौकार मारले. ५० षटकात भारतीय महिला संघाने ७ गडी गमावून ३४२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने महिला संघासमोर ३४३ धावांचे लक्ष होते.

Comments
Add Comment

IPL 2026 Mumbai Indians : मुंबई संघाचं टेन्शन वाढलं! अनुभवी मिचेल सॅंटनर स्पर्धेतून बाहेर

- केशव महाराजला मिळणार संघात स्थान आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

IPL मध्ये चाललंय काय ? दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारे ७५ धावांत ऑलआऊट

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस

IPL २०२६ : क्या बात ! १५ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम रिंकु सिंहने मोडला

IPL 2026  : सध्या देशात आयपीएल 2026 ची धुमधाम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुने रेकॉर्ड

IPL 2026 : आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंगक्रिश रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा

Sebastian Sawe : केवळ दोन तासांच्या आत मॅरेथॉनचा विक्रम! सेबॅस्टियन सावेचा ऐतिहासिक पराक्रम

केनियाच्या सेबॅस्टियन सावेने लंडन मॅरेथॉन २०२६ मध्ये इतिहास रचला. त्याने १ तास, ५९ मिनिटे आणि ३० सेकंदात मॅरेथॉन

IPL 2026 : अंगक्रिश रघुवंशीची विकेट वादात, 'क्षेत्ररक्षणात अडथळा' म्हणजे काय?

मुंबई : आयपीएल २०२६ चा ३८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात,