Monsoon : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी ;मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली

मुंबई: उकाड्याने घामाघूम झालेल्या तसंच आकाशाकडे डोळ लावून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रा यंदा मान्सूची सुरुवात कधी होणार आहे, याची तारीख ठरलीय. तर चला पाहूयात महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याची माहिती


यंदा मान्सून 10 दिवस अगोदरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. केरळमध्ये तो 19 मेपर्यंत दाखल होणार असल्याचा ताजा अंदाजही वर्तवलाय. मान्सूनचं आगमन लवकर होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. कारण हा मान्सून पेरणीसाठी फलदायी ठरणार आहे, असाही अंदाज वर्तवण्यात आलाय.


अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टाही निर्माण झालाय. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णता वाढलीय. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलाय. याचा परिणाम म्हणून बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरांवर बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. इतकंच नव्हे तर यंदा ला निना आणि एल निनोचा प्रभाव दिसत नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण 105 टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय.



केरळमध्ये मान्सून दरवर्षी 18 ते 22 मे दरम्यान दाखल होतो. यंदाही 18 ते 19 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे. केरळमध्येही पावसाच्या आगमनाची तारीख 1 जून ही असते, मात्र यंदा 10 दिवस अगोदर पाऊस केरळमद्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.


महाराष्ट्रात साधारणपणे 7 ते 11 जून दरम्यान मान्सून दाखल होतो. मात्र यंदा राज्यात मान्सून 5 ते 7 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय. तर 13 मेपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. यंदा महाराष्ट्रात 103 ते 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे.




Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा