भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बंद असलेली ३२ विमानतळे सुरू होणार

  38

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या सुचनेनुसार भारतीय हवाई क्षेत्र आता पूर्णपणे उघडण्यात आली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादारम्यान बंद असलेली ३२ विमानताळे उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने असे म्हटले आहे की प्रवाशांच्या लक्ष वेधण्यासाठी १५ मे २०२५ रोजी सकाळी ५. २९ वाजेपर्यंत ३२ विमानतळे नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. पण आता ही विमानतळे तात्काळ नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत.


या कालावधीमध्ये प्रवाशांना नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा आणि एअरलाइन्सशी थेट संपर्क साधून त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे केवळ हवाई वाहतूक कमी होण्यास मदत होणार नाही तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही फायदा होणार आहे.


७ मे रोजी भारतीय सैनिकांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशदवादी अड्ड्यावर हल्ला केला आणि पहलगाम दहशदवादी हल्ल्याचा बदल घेतला ज्यामध्ये २६ निष्पाप लोक मारली गेली होती. यामधील बहुतेक लोक ही पर्यटक होती. भारतीय सैन्यांच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्ताननेही नियंत्रण रेषा आणि सीमेपलीकडील ड्रोन तसेच क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले. हे लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध शनिवारी सकाळपर्यंत लागू राहणार होत. पण नंतरच्या वाढत्या तणावामुळे ते १५ मे पर्यंत वाढवण्यात आले.



भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतरचा हा निर्णय सामान्य विमान वाहतूक क्रियाकलाप पुनर्संचयित करण्याचे संकेत देत आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना फायदा होईल. ऑपरेशन सिंदूर' नंतर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि पश्चिम भारतामधील अनेक विमानतळं तात्पुरती बंद करण्यात आली होती. २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा, जामनगर आणि इतर अनेक विमानतळ बंद करण्यात आली होती. एकट्या इंडिगोने त्यांच्या १६० ते १६५ नियोजित विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आता देशातील तात्पुरती बंद करण्यात आलेली ३२ विमानतळांची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.


विमानसेवा सुरु झालेल्या विमानतळांची यादी




  1. अधमपूर

  2. अंबाला

  3. अमृतसर

  4. अवंतीपूर

  5. भटिंडा

  6. भुज

  7. बिकानेर

  8. चंदीगड

  9. हलवारा

  10. हिंडन

  11. जैसलमेर

  12. जम्मू

  13. जामनगर

  14. जोधपूर

  15. कांडला

  16. कांगडा (गग्गल)

  17. केशोड

  18. किशनगड

  19. कुल्लू मनाली (भुंटर)

  20. लेह

  21. लुधियाना

  22. मुंद्रा

  23. नळ्या

  24. पठाणकोट

  25. पटियाला

  26. पोरबंदर

  27. राजकोट (हिरासर)

  28. सारसावा

  29. शिमला

  30. श्रीनगर

  31. थोइस

  32. उत्तरलाई

Comments
Add Comment

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

Warren Buffett Donation: आणखी एक ! ९४ वर्षीय वॉरन बफे यांची ६ अब्ज डॉलरची देणगी! २० वर्षांतील सर्वात मोठी....

प्रतिनिधी: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व सध्या जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत वॉरन बफे (Warren Buffett) यांनी गेल्या

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

शेफालीने सलमान-अक्षयच्या चित्रपटातून केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण

शेफाली जरीवाला यांनी 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांटा लगा' या पॉप गाण्यामुळे अमाप लोकप्रियता मिळवली. हे गाणे

Woman Kirtankar Murder: महिला कीर्तनकारची आश्रमात दगडाने ठेचून हत्या, संभाजीनगर हादरले

संभाजीनगर: वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकाराची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Woman Kirtankar Murder)

Asian Paints Acquisition: ब्रेकिंग! एशियन पेंटसने White Leak डेकोर कंपनीचे संपूर्ण अधिग्रहण केले

प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठ्या रंग उत्पादन कंपनीपैकी एक एशियन पेंटस (Asian Paints) कंपनीने लाईटिंग घर सजावट कंपनी (Home Decor)