भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बंद असलेली ३२ विमानतळे सुरू होणार

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या सुचनेनुसार भारतीय हवाई क्षेत्र आता पूर्णपणे उघडण्यात आली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादारम्यान बंद असलेली ३२ विमानताळे उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने असे म्हटले आहे की प्रवाशांच्या लक्ष वेधण्यासाठी १५ मे २०२५ रोजी सकाळी ५. २९ वाजेपर्यंत ३२ विमानतळे नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. पण आता ही विमानतळे तात्काळ नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत.


या कालावधीमध्ये प्रवाशांना नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा आणि एअरलाइन्सशी थेट संपर्क साधून त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे केवळ हवाई वाहतूक कमी होण्यास मदत होणार नाही तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही फायदा होणार आहे.


७ मे रोजी भारतीय सैनिकांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशदवादी अड्ड्यावर हल्ला केला आणि पहलगाम दहशदवादी हल्ल्याचा बदल घेतला ज्यामध्ये २६ निष्पाप लोक मारली गेली होती. यामधील बहुतेक लोक ही पर्यटक होती. भारतीय सैन्यांच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्ताननेही नियंत्रण रेषा आणि सीमेपलीकडील ड्रोन तसेच क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले. हे लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध शनिवारी सकाळपर्यंत लागू राहणार होत. पण नंतरच्या वाढत्या तणावामुळे ते १५ मे पर्यंत वाढवण्यात आले.



भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतरचा हा निर्णय सामान्य विमान वाहतूक क्रियाकलाप पुनर्संचयित करण्याचे संकेत देत आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना फायदा होईल. ऑपरेशन सिंदूर' नंतर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि पश्चिम भारतामधील अनेक विमानतळं तात्पुरती बंद करण्यात आली होती. २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा, जामनगर आणि इतर अनेक विमानतळ बंद करण्यात आली होती. एकट्या इंडिगोने त्यांच्या १६० ते १६५ नियोजित विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आता देशातील तात्पुरती बंद करण्यात आलेली ३२ विमानतळांची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.


विमानसेवा सुरु झालेल्या विमानतळांची यादी




  1. अधमपूर

  2. अंबाला

  3. अमृतसर

  4. अवंतीपूर

  5. भटिंडा

  6. भुज

  7. बिकानेर

  8. चंदीगड

  9. हलवारा

  10. हिंडन

  11. जैसलमेर

  12. जम्मू

  13. जामनगर

  14. जोधपूर

  15. कांडला

  16. कांगडा (गग्गल)

  17. केशोड

  18. किशनगड

  19. कुल्लू मनाली (भुंटर)

  20. लेह

  21. लुधियाना

  22. मुंद्रा

  23. नळ्या

  24. पठाणकोट

  25. पटियाला

  26. पोरबंदर

  27. राजकोट (हिरासर)

  28. सारसावा

  29. शिमला

  30. श्रीनगर

  31. थोइस

  32. उत्तरलाई

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर