भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बंद असलेली ३२ विमानतळे सुरू होणार

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या सुचनेनुसार भारतीय हवाई क्षेत्र आता पूर्णपणे उघडण्यात आली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादारम्यान बंद असलेली ३२ विमानताळे उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने असे म्हटले आहे की प्रवाशांच्या लक्ष वेधण्यासाठी १५ मे २०२५ रोजी सकाळी ५. २९ वाजेपर्यंत ३२ विमानतळे नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. पण आता ही विमानतळे तात्काळ नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत.


या कालावधीमध्ये प्रवाशांना नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा आणि एअरलाइन्सशी थेट संपर्क साधून त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे केवळ हवाई वाहतूक कमी होण्यास मदत होणार नाही तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही फायदा होणार आहे.


७ मे रोजी भारतीय सैनिकांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशदवादी अड्ड्यावर हल्ला केला आणि पहलगाम दहशदवादी हल्ल्याचा बदल घेतला ज्यामध्ये २६ निष्पाप लोक मारली गेली होती. यामधील बहुतेक लोक ही पर्यटक होती. भारतीय सैन्यांच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्ताननेही नियंत्रण रेषा आणि सीमेपलीकडील ड्रोन तसेच क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले. हे लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध शनिवारी सकाळपर्यंत लागू राहणार होत. पण नंतरच्या वाढत्या तणावामुळे ते १५ मे पर्यंत वाढवण्यात आले.



भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतरचा हा निर्णय सामान्य विमान वाहतूक क्रियाकलाप पुनर्संचयित करण्याचे संकेत देत आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना फायदा होईल. ऑपरेशन सिंदूर' नंतर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि पश्चिम भारतामधील अनेक विमानतळं तात्पुरती बंद करण्यात आली होती. २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा, जामनगर आणि इतर अनेक विमानतळ बंद करण्यात आली होती. एकट्या इंडिगोने त्यांच्या १६० ते १६५ नियोजित विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आता देशातील तात्पुरती बंद करण्यात आलेली ३२ विमानतळांची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.


विमानसेवा सुरु झालेल्या विमानतळांची यादी




  1. अधमपूर

  2. अंबाला

  3. अमृतसर

  4. अवंतीपूर

  5. भटिंडा

  6. भुज

  7. बिकानेर

  8. चंदीगड

  9. हलवारा

  10. हिंडन

  11. जैसलमेर

  12. जम्मू

  13. जामनगर

  14. जोधपूर

  15. कांडला

  16. कांगडा (गग्गल)

  17. केशोड

  18. किशनगड

  19. कुल्लू मनाली (भुंटर)

  20. लेह

  21. लुधियाना

  22. मुंद्रा

  23. नळ्या

  24. पठाणकोट

  25. पटियाला

  26. पोरबंदर

  27. राजकोट (हिरासर)

  28. सारसावा

  29. शिमला

  30. श्रीनगर

  31. थोइस

  32. उत्तरलाई

Comments
Add Comment

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

ॲमेझॉन एअर ने आता ५ पट वेगाने डिलिव्हरी होणार

नवी दिल्ली : ॲमेझॉन एअरची ईशान्य भारतात सेवा विस्तारत असल्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत नवीन कार्गो मार्ग हे

Health Tips : ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास 'या' गोष्टींकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, अशी घ्या आरोग्याची काळजी

जर तुम्हाला हाई ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य वेळी

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.

अभिनेत्री दिपिका कक्कड भावूक, आरोग्याविषयी व्यक्त केली चिंता

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड हिला २०२५ मध्ये आपल्याला कॅन्सर असल्याचे समजले. नुकताच यासंबधित