मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचणार

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत पावसाला महत्त्व आहे. यामुळे दरवर्षी देशात मान्सूनचे आगमन कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ मेपर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून पोहोचणार आहे. तिथून वेगाने पुढे वाटचाल करत मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

साधारण एक जून पर्यंत केरळमध्ये मान्सून पोहोचतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील पाच वर्षांत दोनवेळा मान्सून १ जूनच्या आधी केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये २०२४ मध्ये ३० मे तर २०२२ मध्ये २९ मे रोजी मान्सून पोहोचला होता.

वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये पडणारा पाऊस, इंडोनेशियावरील वरच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, ईशान्य हिंदी महासागरावरील खालच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, दक्षिण चीन समुद्रावरील थर्मल रेडिएशन, उष्णकटिबंधीय वायव्य प्रशांत महासागरावरील समुद्रसपाटीचा सरासरी दाब हे तपासून भारतात मान्सून कधीपर्यंत पोहोचणार याचा अंदाज हवामान विभाग व्यक्त करतो. यंदाही याच निकषांच्या आधारे हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची भाकीत वर्तवले आहे. वातावरणात आयत्यावेळी बदल झाला तर या अंदाजात चार ते सात दिवस पुढे - मागे फरक पडण्याची शक्यता असते.

केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतरच महाराष्ट्रात कधी पर्यंत पोहोचणार याचा नेमका अंदाज वर्तवणे सोपो जाते. प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत १० जून आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जून पर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात किती ताकद आहे याचाही महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. यामुळे केरळमध्ये मान्सून पोहोचला की महाराष्ट्राबाबतचा नेमका अंदाज वर्तवता येईल, असे हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा, विदर्भ येथे १४ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने सांगितले. अवकाळी पावसामुळे राज्यातील निवडक जिल्ह्यांचे तापमान कमी होण्यास मदत होण्याचीही शक्यता आहे.
Comments
Add Comment

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी

Major Diplomatic Twist India-Nepal Meeting : नेपाळचा भारताकडे स्पष्ट कल! दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनची चिंता वाढली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक