मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचणार

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत पावसाला महत्त्व आहे. यामुळे दरवर्षी देशात मान्सूनचे आगमन कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ मेपर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून पोहोचणार आहे. तिथून वेगाने पुढे वाटचाल करत मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

साधारण एक जून पर्यंत केरळमध्ये मान्सून पोहोचतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील पाच वर्षांत दोनवेळा मान्सून १ जूनच्या आधी केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये २०२४ मध्ये ३० मे तर २०२२ मध्ये २९ मे रोजी मान्सून पोहोचला होता.

वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये पडणारा पाऊस, इंडोनेशियावरील वरच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, ईशान्य हिंदी महासागरावरील खालच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, दक्षिण चीन समुद्रावरील थर्मल रेडिएशन, उष्णकटिबंधीय वायव्य प्रशांत महासागरावरील समुद्रसपाटीचा सरासरी दाब हे तपासून भारतात मान्सून कधीपर्यंत पोहोचणार याचा अंदाज हवामान विभाग व्यक्त करतो. यंदाही याच निकषांच्या आधारे हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची भाकीत वर्तवले आहे. वातावरणात आयत्यावेळी बदल झाला तर या अंदाजात चार ते सात दिवस पुढे - मागे फरक पडण्याची शक्यता असते.

केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतरच महाराष्ट्रात कधी पर्यंत पोहोचणार याचा नेमका अंदाज वर्तवणे सोपो जाते. प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत १० जून आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जून पर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात किती ताकद आहे याचाही महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. यामुळे केरळमध्ये मान्सून पोहोचला की महाराष्ट्राबाबतचा नेमका अंदाज वर्तवता येईल, असे हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा, विदर्भ येथे १४ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने सांगितले. अवकाळी पावसामुळे राज्यातील निवडक जिल्ह्यांचे तापमान कमी होण्यास मदत होण्याचीही शक्यता आहे.
Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च