मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचणार

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत पावसाला महत्त्व आहे. यामुळे दरवर्षी देशात मान्सूनचे आगमन कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ मेपर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून पोहोचणार आहे. तिथून वेगाने पुढे वाटचाल करत मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

साधारण एक जून पर्यंत केरळमध्ये मान्सून पोहोचतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील पाच वर्षांत दोनवेळा मान्सून १ जूनच्या आधी केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये २०२४ मध्ये ३० मे तर २०२२ मध्ये २९ मे रोजी मान्सून पोहोचला होता.

वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये पडणारा पाऊस, इंडोनेशियावरील वरच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, ईशान्य हिंदी महासागरावरील खालच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, दक्षिण चीन समुद्रावरील थर्मल रेडिएशन, उष्णकटिबंधीय वायव्य प्रशांत महासागरावरील समुद्रसपाटीचा सरासरी दाब हे तपासून भारतात मान्सून कधीपर्यंत पोहोचणार याचा अंदाज हवामान विभाग व्यक्त करतो. यंदाही याच निकषांच्या आधारे हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची भाकीत वर्तवले आहे. वातावरणात आयत्यावेळी बदल झाला तर या अंदाजात चार ते सात दिवस पुढे - मागे फरक पडण्याची शक्यता असते.

केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतरच महाराष्ट्रात कधी पर्यंत पोहोचणार याचा नेमका अंदाज वर्तवणे सोपो जाते. प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत १० जून आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जून पर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात किती ताकद आहे याचाही महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. यामुळे केरळमध्ये मान्सून पोहोचला की महाराष्ट्राबाबतचा नेमका अंदाज वर्तवता येईल, असे हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा, विदर्भ येथे १४ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने सांगितले. अवकाळी पावसामुळे राज्यातील निवडक जिल्ह्यांचे तापमान कमी होण्यास मदत होण्याचीही शक्यता आहे.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी