Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

"शस्त्रसंधी उल्लंघनास पाकिस्तानच जबाबदार" भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला पाकचा समाचार

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्धच्या लष्करी कारवाया थांबवण्यास औपचारिकपणे सहमती दर्शविल्यानंतर काही तासांतच, श्रीनगर आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन भारतीय हवाई क्षेत्रात घुसल्याने मोठे स्फोट ऐकू आले. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले.


भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. "सशस्त्र दल परिस्थितीवर कडक नजर ठेवून आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमा तसेच  नियंत्रण रेषेवर सीमा उल्लंघनाच्या घटनेला प्रत्युत्तर देण्याच्या कडक सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत," असे मिस्री म्हणाले.



 



 

शस्त्रसंधी करारापूर्वी, भारताने स्पष्टपणे सांगितले होते की आमच्या भूमीवर होणारे कोणतेही "दहशतवादी कृत्य" हे "युद्धाचे कृत्य" मानले जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल.




काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट


जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर श्रीनगरमधील हवाई संरक्षण युनिट्स पुन्हा सक्रिय झाल्याची सूचना दिली. "ही शस्त्रसंधी नाहीच. श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या हवाई संरक्षण युनिट्स आताच सक्रिय झाल्या आहेत," असे ते म्हणाले.


">

नागरोटा येथील लष्कराच्या तुकडीत गोळीबार


जम्मूजवळील नागरोटा येथील लष्कराच्या तुकडीत संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर गोळीबाराची घटना घडली. ज्यात एक जवान किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुरुवातीला गोळीबार झाला, परंतु त्यानंतर कोणताही संपर्क झालेला नाही. सुरक्षा दलांनी धोक्याचे स्वरूप आणि स्रोत निश्चित करण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment