India Pakistan Tension: पंजाबमधील अनेक शहरांमध्ये पुन्हा ब्लॅकआउट, राजस्थानमधील जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली: भेकड्या पाकिस्तानने स्वतःहून पुढे येत भारताविरुद्धचा सुरू असलेला संघर्ष थांबवत असल्याचे सांगत पुन्हा एकदा फना काढण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थितीला विराम लागू केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पकड्यांनी पुन्हा एकदा भारताच्या सीमेलगत असलेल्या शहरांवर हल्ले चढवले. पण भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न देखील हाणून पाडला आहे.


पाकिस्तानने पुन्हा केलेल्या हल्ल्यानंतर, पंजाबमधील फिरोजपूर, गुरुदासपूर, मुक्तसर, होशियारपूर, बर्नाला, मोगा, पठाणकोट, फाजिल्का, कपूरथला आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट लागू करण्यात आला.  राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले जे हवेतच नष्ट करण्यात आले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. तर बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला.



पोखरण आणि बारमेरमध्ये ड्रोन हल्ले


पाकिस्तानकडून राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारताने हवेतच नष्ट केले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आणि बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, जोधपूरमधील सर्व बाजारपेठा बंद होत्या.



पंजाबमधील जिल्हयात ब्लॅकआऊट


पंजाबमधील जिल्ह्यांत शनिवार रात्रीचा ब्लॅकआउट पुन्हा एकदा सतर्क राहण्याची घोषणा करून गेला.  भटिंडामध्ये लोकांनी स्वतःहून ब्लॅकआउट लागू केले. अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती ड्रोनची हालचाल सुरू असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


आदल्या दिवशीही पाकिस्तानने पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन डागले होते. पठाणकोट हवाई तळ आणि लष्करी क्षेत्र, जालंधरमधील आदमपूर विमानतळ, बीएसएफ छावणी, हरिके हेड वर्क्स, श्री गोइंदवाल साहिब येथील थर्मल प्लांटवर हल्ला करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारताने यशस्वीरित्या हाणून पाडले होते.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या