India Pakistan Tension: पंजाबमधील अनेक शहरांमध्ये पुन्हा ब्लॅकआउट, राजस्थानमधील जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली: भेकड्या पाकिस्तानने स्वतःहून पुढे येत भारताविरुद्धचा सुरू असलेला संघर्ष थांबवत असल्याचे सांगत पुन्हा एकदा फना काढण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थितीला विराम लागू केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पकड्यांनी पुन्हा एकदा भारताच्या सीमेलगत असलेल्या शहरांवर हल्ले चढवले. पण भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न देखील हाणून पाडला आहे.


पाकिस्तानने पुन्हा केलेल्या हल्ल्यानंतर, पंजाबमधील फिरोजपूर, गुरुदासपूर, मुक्तसर, होशियारपूर, बर्नाला, मोगा, पठाणकोट, फाजिल्का, कपूरथला आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट लागू करण्यात आला.  राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले जे हवेतच नष्ट करण्यात आले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. तर बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला.



पोखरण आणि बारमेरमध्ये ड्रोन हल्ले


पाकिस्तानकडून राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारताने हवेतच नष्ट केले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आणि बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, जोधपूरमधील सर्व बाजारपेठा बंद होत्या.



पंजाबमधील जिल्हयात ब्लॅकआऊट


पंजाबमधील जिल्ह्यांत शनिवार रात्रीचा ब्लॅकआउट पुन्हा एकदा सतर्क राहण्याची घोषणा करून गेला.  भटिंडामध्ये लोकांनी स्वतःहून ब्लॅकआउट लागू केले. अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती ड्रोनची हालचाल सुरू असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


आदल्या दिवशीही पाकिस्तानने पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन डागले होते. पठाणकोट हवाई तळ आणि लष्करी क्षेत्र, जालंधरमधील आदमपूर विमानतळ, बीएसएफ छावणी, हरिके हेड वर्क्स, श्री गोइंदवाल साहिब येथील थर्मल प्लांटवर हल्ला करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारताने यशस्वीरित्या हाणून पाडले होते.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही