India Pakistan Tension: पंजाबमधील अनेक शहरांमध्ये पुन्हा ब्लॅकआउट, राजस्थानमधील जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली: भेकड्या पाकिस्तानने स्वतःहून पुढे येत भारताविरुद्धचा सुरू असलेला संघर्ष थांबवत असल्याचे सांगत पुन्हा एकदा फना काढण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थितीला विराम लागू केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पकड्यांनी पुन्हा एकदा भारताच्या सीमेलगत असलेल्या शहरांवर हल्ले चढवले. पण भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न देखील हाणून पाडला आहे.


पाकिस्तानने पुन्हा केलेल्या हल्ल्यानंतर, पंजाबमधील फिरोजपूर, गुरुदासपूर, मुक्तसर, होशियारपूर, बर्नाला, मोगा, पठाणकोट, फाजिल्का, कपूरथला आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट लागू करण्यात आला.  राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले जे हवेतच नष्ट करण्यात आले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. तर बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला.



पोखरण आणि बारमेरमध्ये ड्रोन हल्ले


पाकिस्तानकडून राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारताने हवेतच नष्ट केले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आणि बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, जोधपूरमधील सर्व बाजारपेठा बंद होत्या.



पंजाबमधील जिल्हयात ब्लॅकआऊट


पंजाबमधील जिल्ह्यांत शनिवार रात्रीचा ब्लॅकआउट पुन्हा एकदा सतर्क राहण्याची घोषणा करून गेला.  भटिंडामध्ये लोकांनी स्वतःहून ब्लॅकआउट लागू केले. अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती ड्रोनची हालचाल सुरू असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


आदल्या दिवशीही पाकिस्तानने पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन डागले होते. पठाणकोट हवाई तळ आणि लष्करी क्षेत्र, जालंधरमधील आदमपूर विमानतळ, बीएसएफ छावणी, हरिके हेड वर्क्स, श्री गोइंदवाल साहिब येथील थर्मल प्लांटवर हल्ला करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारताने यशस्वीरित्या हाणून पाडले होते.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे