India Pakistan Tension: पंजाबमधील अनेक शहरांमध्ये पुन्हा ब्लॅकआउट, राजस्थानमधील जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली: भेकड्या पाकिस्तानने स्वतःहून पुढे येत भारताविरुद्धचा सुरू असलेला संघर्ष थांबवत असल्याचे सांगत पुन्हा एकदा फना काढण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थितीला विराम लागू केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पकड्यांनी पुन्हा एकदा भारताच्या सीमेलगत असलेल्या शहरांवर हल्ले चढवले. पण भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न देखील हाणून पाडला आहे.


पाकिस्तानने पुन्हा केलेल्या हल्ल्यानंतर, पंजाबमधील फिरोजपूर, गुरुदासपूर, मुक्तसर, होशियारपूर, बर्नाला, मोगा, पठाणकोट, फाजिल्का, कपूरथला आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट लागू करण्यात आला.  राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले जे हवेतच नष्ट करण्यात आले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. तर बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला.



पोखरण आणि बारमेरमध्ये ड्रोन हल्ले


पाकिस्तानकडून राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारताने हवेतच नष्ट केले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आणि बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, जोधपूरमधील सर्व बाजारपेठा बंद होत्या.



पंजाबमधील जिल्हयात ब्लॅकआऊट


पंजाबमधील जिल्ह्यांत शनिवार रात्रीचा ब्लॅकआउट पुन्हा एकदा सतर्क राहण्याची घोषणा करून गेला.  भटिंडामध्ये लोकांनी स्वतःहून ब्लॅकआउट लागू केले. अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती ड्रोनची हालचाल सुरू असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


आदल्या दिवशीही पाकिस्तानने पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन डागले होते. पठाणकोट हवाई तळ आणि लष्करी क्षेत्र, जालंधरमधील आदमपूर विमानतळ, बीएसएफ छावणी, हरिके हेड वर्क्स, श्री गोइंदवाल साहिब येथील थर्मल प्लांटवर हल्ला करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारताने यशस्वीरित्या हाणून पाडले होते.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान