Hina Khan : भारत पाक संघर्षाबद्दल काय म्हणाली हिना खान? ट्रोलर्सनी साधला निशाणा

मुंबई: अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. हिना कायम स्वतःच्या प्रकृतीची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. पण आता तिने तिच्या प्रकृतीबद्दल नाही तर, भारत – पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावग्रस्त वातावरणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे ती नव्याने चर्चेत आली आहे.



काय म्हणाली हिना खान?


भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाबद्दल हिना खानने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हंटले आहे की, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला उत्तर देणं फार गरजेचं होतं. माझा भारतीय सैन्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण हिनाने पुढे असंही म्हटलं की, दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिघडू नये. हिनाने अल्लाहला प्रार्थना केली की, जे चुकीच्या मार्गावर गेले आहेत त्यांना योग्य मार्ग दाखव. शुक्रवारी हिनाने केलेल्या या पोस्टनंतर तिला प्रचंड ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे.




ट्रोलर्सला दिले प्रत्युत्तर


ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत हिना म्हणाली, ‘मला नेहमीच सीमेपलीकडून फक्त प्रेम आणि आपुलकीचा अनुभव आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी आणि नंतर मला माझ्या देशावर प्रेम आहे. अनेकांनी मला दोष दिला, मला शिव्या आणि धमक्या देखील दिल्या…’


‘अनेकांनी मला अनफॉलो करण्याची धमकी दिली आहे. अश्लील कमेंट आणि तिरस्कार व्यक्त करताना दिसत आहेत. माझा आजार, कुटुंबावर, धर्मावर देखील निशाणा साधला आहे. मी माझ्या देशासोबत आहे. कदाचित हाच फरक आहे, जर मी भारतीय नसती तर मी काहीच नसती.’


पुढे हिना असे देखील म्हणाली, ‘तुम्हाला जे काही करायचं आहे करा. मला काहीही फरक पडत नाही आणि त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी कोणाला वाईट बोलली नाही किंवा कोणाचा अपमान केला नाही. मी फक्त माझ्या देशाची बाजू घेतली आहे.’ असं देखील अभिनेत्री हिना खान म्हणाली. हिना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Comments
Add Comment

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

फरहान अख्तर आणि सुखविंदर सिंग लखनऊमध्ये १२० बहादूरच्या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगसाठी पुन्हा एकत्र येणार!

मुंबई : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजचा आगामी युद्ध नाटक, १२० बहादूर, या वर्षातील सर्वात चर्चेत

सतीश शाहांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच पाठवला होता मेसेज : सचिन पिळगावकरने दिली माहिती !

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर आपल्या खास विनोदीशैलीने चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन

AI मुळे दीड वर्षातच बंद होतील मराठी आणि हिंदी चित्रपट ; दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत

 मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या