पद्म पुरस्कार समितीवर मंत्री नितेश राणेंची निवड

मुंबई : दरवर्षी प्रजात्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्यावतीने नागरी सन्मान केले जातात. पद्म पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी देशभरातून शिफारशी मागवल्या जातात. महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाने एक सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यातील गुणवतं नागरिकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पद्म पुरस्कारासाठी राज्याच्यावतीने शिफारस करण्यासाठी नावं सुचविणार आहे. या समितीत राज्य शासनाच्या सात मंत्र्यांचा समावेश आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल आहेत. समितीत सदस्य म्हणून मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले आणखी दोन जण आहेत. यापैकी एक आहेत ते आशिष शेलार आणि दुसरे आहेत नितेश राणे.

समितीत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री आहेत. शिवसेनेकडून दादा भुसे आणि उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे आहेत.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, सरकारकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी योग्य व्यक्तींची शिफारस ही समिती राज्य सरकारला करेल.
Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक