IPL 2025 : IPL स्थगित, आता BCCI समोर काय आहेत पर्याय?

भारत - पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाचा आयपीएल स्पर्धेला फटका बसलाय. पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट करण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. तेव्हा आयपीएलचे सामने पुन्हा खेळवले जाणार का, बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलंय.


पाकिस्तानकडून सलग दोन दिवस ड्रोन हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा विचार करता सीमावर्ती भागात ब्लॉकआऊट करण्यात येतं. त्यामुळे धरमशाला येथे खेळवला गेलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्ध्यावर रद्द करण्यात आला. इतकंच नव्हे तर आता आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आलीय. भारत सरकारशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतलाय. यंदाच्या हंगामातील आयपीएलचे अद्याप १६ सामने खेळायचे बाकी आहेत. यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना हा २५ मे रोजी खेळवण्यात येणार होता. मात्र भारत - पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आलीय. आयपीएलच्या स्पर्धेत प्लेऑफ आणि अंतिम सामन्यासह एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी आतापर्यंत ५८ सामने खेळवले गेले आहेत.


?si=n0mS7wtEhV05hel-


या सर्व घडामोडींवर बीसीसीआय काय निर्णय घेऊ शकते ? हे पाहुयात



  • एका दिवसात दोन सामने खेळवणं

  • आठ ते दहा दिवसात स्पर्धा पूर्ण करणं

  • अन्य देशातल्या खेळाडूंची उपलब्धता तपासणं

  • सामने खेळवण्यासाठी अन्य काही स्टेडियमचा विचार करणं

  • उर्वरित सामने दुसर्‍या देशात खेळवणं


बीसीसीआयकडून असे सर्व निर्णय घेण्यात येऊ शकतात


ऑगस्टमध्ये टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. मात्र बांगलादेशातली अस्थिरता पाहता हा दौराही अधांतरी असल्याची चर्चा आहे. एकूणच भारत - पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. तेव्हा क्रिकेटप्रेमींना वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Rohit Sharma : महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले; 'त्या' भावूक क्षणाचा फोटो होतोय व्हायरल!

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) अखेर आपला पहिला वनडे वर्ल्ड कप (First ODI World Cup) जिंकून इतिहास रचला आहे.

भारताच्या मुलींची कमाल, वर्ल्डकप जिंकून केली धमाल; फक्त १० मुद्यात वाचा टीम इंडियाच्या विजयाची गोष्ट

नवी मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक