IPL 2025 : IPL स्थगित, आता BCCI समोर काय आहेत पर्याय?

  71

भारत - पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाचा आयपीएल स्पर्धेला फटका बसलाय. पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट करण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. तेव्हा आयपीएलचे सामने पुन्हा खेळवले जाणार का, बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलंय.


पाकिस्तानकडून सलग दोन दिवस ड्रोन हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा विचार करता सीमावर्ती भागात ब्लॉकआऊट करण्यात येतं. त्यामुळे धरमशाला येथे खेळवला गेलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्ध्यावर रद्द करण्यात आला. इतकंच नव्हे तर आता आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आलीय. भारत सरकारशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतलाय. यंदाच्या हंगामातील आयपीएलचे अद्याप १६ सामने खेळायचे बाकी आहेत. यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना हा २५ मे रोजी खेळवण्यात येणार होता. मात्र भारत - पाकिस्तान तणावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आलीय. आयपीएलच्या स्पर्धेत प्लेऑफ आणि अंतिम सामन्यासह एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी आतापर्यंत ५८ सामने खेळवले गेले आहेत.


?si=n0mS7wtEhV05hel-


या सर्व घडामोडींवर बीसीसीआय काय निर्णय घेऊ शकते ? हे पाहुयात



  • एका दिवसात दोन सामने खेळवणं

  • आठ ते दहा दिवसात स्पर्धा पूर्ण करणं

  • अन्य देशातल्या खेळाडूंची उपलब्धता तपासणं

  • सामने खेळवण्यासाठी अन्य काही स्टेडियमचा विचार करणं

  • उर्वरित सामने दुसर्‍या देशात खेळवणं


बीसीसीआयकडून असे सर्व निर्णय घेण्यात येऊ शकतात


ऑगस्टमध्ये टीम इंडिया बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. मात्र बांगलादेशातली अस्थिरता पाहता हा दौराही अधांतरी असल्याची चर्चा आहे. एकूणच भारत - पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. तेव्हा क्रिकेटप्रेमींना वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र