Helicopter service in Kedarnath Dham Closed: केदारनाथ धाममधील हेली सेवा बंद, सुरक्षेच्या कारणामुळे घेतला निर्णय

उत्तराखंड:  भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या (India Pakistan Tension) पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या कारणास्तव केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे. ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जाणून घ्या किती काळ बंदी राहणार?


भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षेच्या कारणास्तव, केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.



३२ विमानतळ बंद, अनेक उड्डाणे रद्द 


नागरी उड्डाण मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले की, उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ १५ मे पर्यंत नागरी उड्डाणांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. "भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एअरमेनना सूचना (NOTAMs) ची मालिका जारी केली आहे ज्यामध्ये ९ ते १४ मे २०२५ (१५ मे २०२५ रोजी ०५२९ IST पर्यंत) सर्व नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ तात्पुरते बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे," असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.


भारताने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर" द्वारे दहशतवादी छावण्यांवर केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर, पाकिस्तानने सीमा भागांवर केलेल्या गोळीबारामुळे, तसेच भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील भागातील शहरांवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या प्रयत्नांमुळे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला.



चार धाम यात्रेसाठी सर्व हेलिकॉप्टर सेवा स्थगित 


भारत पाकिस्तान दरम्यानचा वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रेसाठी सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आले आहे.  ज्यामध्ये केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवांचा देखील समावेश आहे, या सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद राहतील.


पुढील सूचना मिळेपर्यंत या सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. उत्तराखंड सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे आदमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू-मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, पटहन, मुंद्रा, पटार, राजकोट, पट्टर, लुधियाना (हिरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोईसे, उत्तरलाई असे एकूण ३२ विमानतळ बंद करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद