Operation Sindoor: पाकड्यांचा दृष्टपणा, आपल्या नागरिकांना मृत्यूच्या दरीत लोटले, हल्ल्यादरम्यान नागरी विमानांचे केले लँडिग, पाहा Photo

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान इतका चवताळला आहे की त्यांना आपल्या सामान्य नागरिकांचीही चिंता नाही. शुक्रवारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की पाकिस्तानने नागरी विमानांना ढाल बनवत आहे. पाकिस्तान भीषण ड्रोन हल्ले करत होते त्यातच त्यांना दमम ते लाहोर या दरम्यान विमाने सुरू ठेवली. हल्ल्यादरम्यान विमानसेवा सुरू होती यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होत होते. त्यांनी फोटोच्या माध्यमातून पाकिस्तानचा दृष्टपणा उघड केला आहे.


फोटो दाखवत त्यांनी पाकिस्तान आपल्या नागरिकांना मृत्यूच्या दरीत कसे ढकलत आहे हे दाखवले. फोटोद्वारे त्यांनी दमम ते लाहोर पोहोचलेल्या फ्लाईटचे डिटेल्स, वेळ आणि रूटची माहिती दिली होती.


गुरूवारी पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांच्या सैन्य ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने S 400ने सर्व हल्ल्यांना निष्फळ केले. आज परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी गुरूवारच्या घटनाक्रमावर अधिकृत ब्रिफींग दिले.


 


कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, काल रात्री पाकिस्तानने घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमेपार ३०० ते ४०० ड्रोनचा वापर करत घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न हाणून पाडला. त्यांनी सांगितले की प्राथमिक तपासानुसार हे समजले की हे ड्रोन तुर्कीचे होते. याला भारतीय लष्कराने संयमाने उत्तर दिले.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन