India-Pakistan Tension: जैसलमेरमध्ये ९, अमृतसरमध्ये १५ ड्रोन पाडले, अवंतीपोरा एअर बेसवरचा हल्ला निष्फळ, पाकला चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: सीमेपारकडून पाकिस्तानने पुन्हा कुरापती करण्यात सुरूवात केली आहे. पाकिस्तानकडून सीमेलगतच्या भागांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर पाकिस्तानने पूंछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही सीमेपलीकडून गोळीबार केला.


अमृतसरच्या ५ विविध भागांमध्ये कमीत कमी १५ ड्रोन दिसले. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील अधिक ड्रोन निष्क्रिय करण्यात आले आहेत. अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या येण्याजाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.


राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात एकूण ९ पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. बाडमेरमध्ये कलेक्टरने एक ड्रोन मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले ड्रोन भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने निष्क्रिय केले आहेत. निष्क्रिय पाकिस्तानी ड्रोनमधून स्फोटक साहित्य एका घरावर पडले यामुळे आगीचे लोळ उठले. घरात राहणाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली.


पाकिस्तानच्या अवंतीपोरा हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले. पाकिस्तानचे ड्रोन मारताना १५ ते २० स्फोट ऐकू आले.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: