India-Pakistan Tension: जैसलमेरमध्ये ९, अमृतसरमध्ये १५ ड्रोन पाडले, अवंतीपोरा एअर बेसवरचा हल्ला निष्फळ, पाकला चोख प्रत्युत्तर

  70

नवी दिल्ली: सीमेपारकडून पाकिस्तानने पुन्हा कुरापती करण्यात सुरूवात केली आहे. पाकिस्तानकडून सीमेलगतच्या भागांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर पाकिस्तानने पूंछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही सीमेपलीकडून गोळीबार केला.


अमृतसरच्या ५ विविध भागांमध्ये कमीत कमी १५ ड्रोन दिसले. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील अधिक ड्रोन निष्क्रिय करण्यात आले आहेत. अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या येण्याजाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.


राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात एकूण ९ पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. बाडमेरमध्ये कलेक्टरने एक ड्रोन मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले ड्रोन भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने निष्क्रिय केले आहेत. निष्क्रिय पाकिस्तानी ड्रोनमधून स्फोटक साहित्य एका घरावर पडले यामुळे आगीचे लोळ उठले. घरात राहणाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली.


पाकिस्तानच्या अवंतीपोरा हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले. पाकिस्तानचे ड्रोन मारताना १५ ते २० स्फोट ऐकू आले.

Comments
Add Comment

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध