India-Pakistan Tension: जैसलमेरमध्ये ९, अमृतसरमध्ये १५ ड्रोन पाडले, अवंतीपोरा एअर बेसवरचा हल्ला निष्फळ, पाकला चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: सीमेपारकडून पाकिस्तानने पुन्हा कुरापती करण्यात सुरूवात केली आहे. पाकिस्तानकडून सीमेलगतच्या भागांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर पाकिस्तानने पूंछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही सीमेपलीकडून गोळीबार केला.


अमृतसरच्या ५ विविध भागांमध्ये कमीत कमी १५ ड्रोन दिसले. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील अधिक ड्रोन निष्क्रिय करण्यात आले आहेत. अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या येण्याजाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.


राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात एकूण ९ पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. बाडमेरमध्ये कलेक्टरने एक ड्रोन मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले ड्रोन भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने निष्क्रिय केले आहेत. निष्क्रिय पाकिस्तानी ड्रोनमधून स्फोटक साहित्य एका घरावर पडले यामुळे आगीचे लोळ उठले. घरात राहणाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली.


पाकिस्तानच्या अवंतीपोरा हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. याला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केले. पाकिस्तानचे ड्रोन मारताना १५ ते २० स्फोट ऐकू आले.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने