भारताने १५ मेपर्यंत २४ एअरपोर्ट केले बंद, पाक तणावादरम्यान मोठा निर्णय

नवी दिल्ली: नागरी उड्डाण मंत्रालयाने भारत-पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान देशातील २४ एअरपोर्टवर देशांतर्गत येण्याजाण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी आता १५ मे सकाळी ५.२९ वाजेपर्यंत असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या एअरपोर्टवर विमाने उड्डाण करणार नाहीत.


पंजाबचे अमृतसर, लुधिया, पटियाला, बठिंडा, हलवाडा, पठाणकोट हे एअरपोर्ट बंद राहतील. तर हिमाचल प्रदेशाचे भुंतर शिमला, कांगडा-गग्गल एअरपोर्ट बंद राहतील. केंद्रशासित प्रदेश चंदीगड एअरपोर्ट, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे श्रीनगर, जम्मू, लेह एअरपोर्ट, राजस्थानचे किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर एअरपोर्ट आणि गुजरातचे मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज एअरपोर्ट बंद राहतील.



एअरलाईन्सची प्रतिक्रिया


एअर इंडिया आणि इंडिगोने अनेक एअरपोर्टसाठी आपल्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोने ग्राहकांना फ्लाईट स्थिती जाणून घेण्यासाठी, पुन्हा बुक करण्यासाठी अथवा रिफंडसाठी लिंक शेअर केल्या आहेत. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढले आहेत. पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांना लक्ष्य बनवत ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते.

Comments
Add Comment

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough