भारताने १५ मेपर्यंत २४ एअरपोर्ट केले बंद, पाक तणावादरम्यान मोठा निर्णय

नवी दिल्ली: नागरी उड्डाण मंत्रालयाने भारत-पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान देशातील २४ एअरपोर्टवर देशांतर्गत येण्याजाण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी आता १५ मे सकाळी ५.२९ वाजेपर्यंत असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या एअरपोर्टवर विमाने उड्डाण करणार नाहीत.


पंजाबचे अमृतसर, लुधिया, पटियाला, बठिंडा, हलवाडा, पठाणकोट हे एअरपोर्ट बंद राहतील. तर हिमाचल प्रदेशाचे भुंतर शिमला, कांगडा-गग्गल एअरपोर्ट बंद राहतील. केंद्रशासित प्रदेश चंदीगड एअरपोर्ट, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे श्रीनगर, जम्मू, लेह एअरपोर्ट, राजस्थानचे किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर एअरपोर्ट आणि गुजरातचे मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज एअरपोर्ट बंद राहतील.



एअरलाईन्सची प्रतिक्रिया


एअर इंडिया आणि इंडिगोने अनेक एअरपोर्टसाठी आपल्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोने ग्राहकांना फ्लाईट स्थिती जाणून घेण्यासाठी, पुन्हा बुक करण्यासाठी अथवा रिफंडसाठी लिंक शेअर केल्या आहेत. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढले आहेत. पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांना लक्ष्य बनवत ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले