भारताने १५ मेपर्यंत २४ एअरपोर्ट केले बंद, पाक तणावादरम्यान मोठा निर्णय

  53

नवी दिल्ली: नागरी उड्डाण मंत्रालयाने भारत-पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान देशातील २४ एअरपोर्टवर देशांतर्गत येण्याजाण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी आता १५ मे सकाळी ५.२९ वाजेपर्यंत असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या एअरपोर्टवर विमाने उड्डाण करणार नाहीत.


पंजाबचे अमृतसर, लुधिया, पटियाला, बठिंडा, हलवाडा, पठाणकोट हे एअरपोर्ट बंद राहतील. तर हिमाचल प्रदेशाचे भुंतर शिमला, कांगडा-गग्गल एअरपोर्ट बंद राहतील. केंद्रशासित प्रदेश चंदीगड एअरपोर्ट, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे श्रीनगर, जम्मू, लेह एअरपोर्ट, राजस्थानचे किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर एअरपोर्ट आणि गुजरातचे मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज एअरपोर्ट बंद राहतील.



एअरलाईन्सची प्रतिक्रिया


एअर इंडिया आणि इंडिगोने अनेक एअरपोर्टसाठी आपल्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोने ग्राहकांना फ्लाईट स्थिती जाणून घेण्यासाठी, पुन्हा बुक करण्यासाठी अथवा रिफंडसाठी लिंक शेअर केल्या आहेत. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढले आहेत. पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांना लक्ष्य बनवत ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते.

Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली