Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट


मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून (९ मे) बस भाड्यात वाढ जाहीर केली आहे. बेस्टने यापूर्वीच लवकरच बस भाडे वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या आठवड्यात, महापालिका प्रमुख भूषण गगराणी यांनी भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार आजपासून बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडे सुधारणेनुसार, जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.



बेस्ट बसचे सुधारित भाडे किती?


मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (MMRTA) मंजूर केलेल्या भाडे सुधारणेनुसार, नॉन-एसी बससाठी किमान बस भाडे १० रुपये आणि एसी बससाठी १२ रुपये असेल. यापूर्वी नॉन-एसी बससाठी ५ रुपये आणि एसी बससाठी ६ रुपये असे भाडे होते. ज्यामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे.



नॉन एसी बससाठी शुल्क


आजपासून लागू झालेल्या नवीन रचनेनुसार, नॉन-एसी बसेसच्या प्रवाशांना ५ किमी, १० किमी, १५ किमी, २० किमी, २५ किमी, ३० किमी, ३५ किमी, ४० किमी, ४५ किमी आणि ५० किमी अंतरासाठी अनुक्रमे १०, २०, ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५ आणि ६० रुपये शुल्क आकारावे लागेल.



एसी बससाठी शुल्क


एसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५ किमी, १० किमी, १५ किमी, २० किमी, २५ किमी, ३० किमी, ३५ किमी, ४० किमी, ४५ किमी आणि ५० किमी अंतरासाठी अनुक्रमे १२, २०, ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६० आणि ६५ रुपये शुल्क आकारावे लागेल. ५० किमी अंतराच्या पलीकडे, प्रत्येक अतिरिक्त ५ किमीसाठी ५ रुपये अतिरिक्त भाडे आकारले जाईल.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत