भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

  56

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक झाली आहे. आज ९ मेला बीसीसीआय आयपीएल २०२५ बाबत अंतिम निर्णय घेऊ शकतो. बीसीसीआयची पहिली प्राथमिकता परदेशी खेळाडूंना त्यांना देशात पाठवण्याची आहे.


आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. अशातच सवाल आहे की हा सामना रंगणार की नाही.


भारत-पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे ८ मे बुधवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. तर धमरशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम खाली करण्यात आले. खेळाडूंना धरमशाला येथून दिल्लीला आणण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात आली. बीसीसीआयने खेळाडू आणि सहयोगी स्टाफला प्राथमिकतेच्या आधारावर वंदे भारतची व्यवस्था केली.



बीसीसीआयचे विधान


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सध्याच्या स्थितीवर गुरूवारी विधान केले. ते म्हणाले, सर्व काही परिस्थिती लक्षात घेता आम्ही सामना रद्द करण्याचा निर्णय घेला आहे. सध्या परिस्थिती योग्य नाही यासाठी ८ मेचा सामना रद्द करण्यात आला. शेजारी देश परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.


Comments
Add Comment

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी

बंगळूरू चेंगराचेंगरी : आरसीबीसह आणखी दोघांविरोधात एफआयआर दाखल

बंगळूरू: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अखेर गुन्हा दाखल

श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका

Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या

RCB vs PBKS: ना कोहली, ना हेझलवूड, कृणाल पांड्या ठरला आरसीबीचा खरा हिरो

मुंबई: १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी विजेतेपदाचा आनंद आला. आरसीबीने

IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी