भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक झाली आहे. आज ९ मेला बीसीसीआय आयपीएल २०२५ बाबत अंतिम निर्णय घेऊ शकतो. बीसीसीआयची पहिली प्राथमिकता परदेशी खेळाडूंना त्यांना देशात पाठवण्याची आहे.


आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. अशातच सवाल आहे की हा सामना रंगणार की नाही.


भारत-पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे ८ मे बुधवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. तर धमरशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम खाली करण्यात आले. खेळाडूंना धरमशाला येथून दिल्लीला आणण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात आली. बीसीसीआयने खेळाडू आणि सहयोगी स्टाफला प्राथमिकतेच्या आधारावर वंदे भारतची व्यवस्था केली.



बीसीसीआयचे विधान


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सध्याच्या स्थितीवर गुरूवारी विधान केले. ते म्हणाले, सर्व काही परिस्थिती लक्षात घेता आम्ही सामना रद्द करण्याचा निर्णय घेला आहे. सध्या परिस्थिती योग्य नाही यासाठी ८ मेचा सामना रद्द करण्यात आला. शेजारी देश परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.


Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या