थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय


नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचललं आहे. भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मना पाकिस्तानातून येणाऱ्या कोणत्याही वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट्स वा अन्य मीडिया कंटेंटचे प्रसारण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


८ मे २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या या सल्ल्यानुसार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०२१ अंतर्गत "मधस्थ आणि प्रकाशकांना" जबाबदार धरून भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणारा कोणताही कंटेंट थेट थांबवण्याचे आदेश आहेत.



माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नमूद केलं की, भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील शासकीय व अर्धशासकीय घटकांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांसह एका नेपाळी नागरिकाचाही मृत्यू झाला होता. हेच लक्षात घेऊन ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.


नैतिक संहितेनुसार, भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था किंवा परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कंटेंटविषयी प्रकाशकांनी जबाबदारीने आणि संयमाने वागले पाहिजे, असे अधोरेखित करण्यात आले आहे.


सरकारच्या आदेशानुसार, सबस्क्रिप्शन असो वा मोफत सेवा, पाकिस्तानातून मूळ असलेला कोणताही डिजिटल कंटेंट भारतात प्रदर्शित करता कामा नये, असे सक्त निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी