थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय


नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचललं आहे. भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मना पाकिस्तानातून येणाऱ्या कोणत्याही वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट्स वा अन्य मीडिया कंटेंटचे प्रसारण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


८ मे २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या या सल्ल्यानुसार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०२१ अंतर्गत "मधस्थ आणि प्रकाशकांना" जबाबदार धरून भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणारा कोणताही कंटेंट थेट थांबवण्याचे आदेश आहेत.



माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नमूद केलं की, भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील शासकीय व अर्धशासकीय घटकांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांसह एका नेपाळी नागरिकाचाही मृत्यू झाला होता. हेच लक्षात घेऊन ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.


नैतिक संहितेनुसार, भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था किंवा परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कंटेंटविषयी प्रकाशकांनी जबाबदारीने आणि संयमाने वागले पाहिजे, असे अधोरेखित करण्यात आले आहे.


सरकारच्या आदेशानुसार, सबस्क्रिप्शन असो वा मोफत सेवा, पाकिस्तानातून मूळ असलेला कोणताही डिजिटल कंटेंट भारतात प्रदर्शित करता कामा नये, असे सक्त निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत.

Comments
Add Comment

Middle East War Beer Price Hike : आता 'चीअर्स' करणं पडणार महाग! मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बियर महागणार ? वाचा सविस्तर

मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या