थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय


नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचललं आहे. भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मना पाकिस्तानातून येणाऱ्या कोणत्याही वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट्स वा अन्य मीडिया कंटेंटचे प्रसारण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


८ मे २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या या सल्ल्यानुसार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०२१ अंतर्गत "मधस्थ आणि प्रकाशकांना" जबाबदार धरून भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणारा कोणताही कंटेंट थेट थांबवण्याचे आदेश आहेत.



माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नमूद केलं की, भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील शासकीय व अर्धशासकीय घटकांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांसह एका नेपाळी नागरिकाचाही मृत्यू झाला होता. हेच लक्षात घेऊन ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.


नैतिक संहितेनुसार, भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था किंवा परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कंटेंटविषयी प्रकाशकांनी जबाबदारीने आणि संयमाने वागले पाहिजे, असे अधोरेखित करण्यात आले आहे.


सरकारच्या आदेशानुसार, सबस्क्रिप्शन असो वा मोफत सेवा, पाकिस्तानातून मूळ असलेला कोणताही डिजिटल कंटेंट भारतात प्रदर्शित करता कामा नये, असे सक्त निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे