Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, 'या' भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत आणि आसपासच्या विभागात तुरळक पाऊस (Mumbai Rain Update) सरी बरसल्या असून, सखल भागात पाणी तुंबल्याचे वृत्त आहे.


मे च्या ऐन उन्हाळ्यात अवकळी पाऊस सलग दोन दिवस राज्याला चांगलाच झोडपत आहे. मुंबई तसेच मुंबईच्या आसपासच्या ठिकाणांची देखील तीच अवस्था आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे.



मुंबईत अवकाळी पाऊस मुसळधार


दोन दिवसांपासून मुंबईत वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली आणि अंधेरीमध्ये ऐन उन्हाळ्यात पाऊसाने हजेरी लावली. पावसामुळे मुंबई उपनगराच्या अंधेरी आणि गोरेगाव येथील सखल भागांत पाणी साचले. तसेच मुंबई आसपासच्या परिसरात तसेच ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमध्ये देखील जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला.



पुढील 4 ते 5 दिवस पाऊस


राज्यात कधी उन्ह तर कधी पाऊस असे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये बुधवारी झालेल्या पावसाने चांगलेच जोडपले आहे. पालघर पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वादळ आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम मच्छिमारांवरही झाला आहे. डहाणू आणि पालघरमध्ये 40 ते 45 बोटींचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटी वादळाच्या तडाख्यात सापडल्या आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.



कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी भागात 30 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7 आणि 8 मे, सिंधुदूर्गमध्ये 8 मे, रायगड जिल्ह्यामध्ये 6 आणि 7 मे रोजी वादळी पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे, या भगत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला

Nitesh Rane : जळगाव जामोदमध्ये फिशिंग क्लस्टर उभारणीसाठी सकारात्मक प्रयत्न; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक फिशिंग क्लस्टर विकसित