Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, 'या' भागात यलो अलर्ट

  140

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत आणि आसपासच्या विभागात तुरळक पाऊस (Mumbai Rain Update) सरी बरसल्या असून, सखल भागात पाणी तुंबल्याचे वृत्त आहे.


मे च्या ऐन उन्हाळ्यात अवकळी पाऊस सलग दोन दिवस राज्याला चांगलाच झोडपत आहे. मुंबई तसेच मुंबईच्या आसपासच्या ठिकाणांची देखील तीच अवस्था आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे.



मुंबईत अवकाळी पाऊस मुसळधार


दोन दिवसांपासून मुंबईत वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली आणि अंधेरीमध्ये ऐन उन्हाळ्यात पाऊसाने हजेरी लावली. पावसामुळे मुंबई उपनगराच्या अंधेरी आणि गोरेगाव येथील सखल भागांत पाणी साचले. तसेच मुंबई आसपासच्या परिसरात तसेच ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमध्ये देखील जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला.



पुढील 4 ते 5 दिवस पाऊस


राज्यात कधी उन्ह तर कधी पाऊस असे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये बुधवारी झालेल्या पावसाने चांगलेच जोडपले आहे. पालघर पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वादळ आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम मच्छिमारांवरही झाला आहे. डहाणू आणि पालघरमध्ये 40 ते 45 बोटींचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटी वादळाच्या तडाख्यात सापडल्या आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.



कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी भागात 30 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7 आणि 8 मे, सिंधुदूर्गमध्ये 8 मे, रायगड जिल्ह्यामध्ये 6 आणि 7 मे रोजी वादळी पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे, या भगत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत