फिटला संदेहो निमाले दुजेपण

  55

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे सुंदर वर्णन केलेले आहे.

सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया

परमेश्वराचे जे पाहता येण्यासारखे रूप आहे ते त्यांनी डोळे भरून पाहिले पण परमेश्वर जसा आहे तसा कुणालाच पाहता येणार नाही, कुणी पाहिलेला नाही व यापुढे पाहता येणार नाही. मी समुद्राचे नेहमी उदाहरण देतो. समुद्र जसा आहे तसा आपल्याला पाहता येत नाही, पण समुद्र वरवर आपण पाहू शकतो. समुद्राच्या काठावर आपण बसलो की आपल्याला त्या किनाऱ्यापासून क्षितिजापर्यंत समुद्र आपल्याला पाहता येतो व आपण म्हणतो हा समुद्र पण समुद्र तेवढाच असतो का? दिसतो तो समुद्र व असतो तो समुद्र यात जमीन अासमानाइतके अंतर आहे.

सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया

 तो श्रीहरी आम्ही पाहिला, पण कसा पाहिला? समुद्र आपण पाहतो तसा पाहिला. त्याचे परिमित रूप जे आहे ते
आम्ही पाहिले.

अनंत रूपे अनंत
वेषे देखिले म्या त्यासी


बाप रखुमादेवीवरू
खूण बाणली ऐसी


देखिला देखिला
माये देवाचा देवो


फिटला संदेहो निमाले दुजेपण अनंत रुपांनी आपण त्याला पाहतोच आहोत, विश्वरूपाने तोच आहे, जगरूपाने तोच आहे, असंख्य जीवजंतूंच्या रूपाने तोच आहे. सांगायचा मुद्दा असा की, परमेश्वर सतत विस्तारीत आहे. “तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग’’ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत जो शब्द वापरलेला आहे तो किती वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. वैज्ञानिक जो शब्द आता वापरतात तोच ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे. वैज्ञानिक काय सांगतात? जग हे विस्तारत विस्तारत जाते. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात “तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग’’. विस्तार हा शब्द महत्त्वाचा आहे. माणसाचा जो विस्तार होतो ना त्यालाच संसार म्हणतात. एका व्यक्तीचा विस्तार होतो तोच संसार. हा वाईट आहे की चांगला? चांगला आहे. बायको, मुले, नातवंडे, पतवंडे असणे हे ऐश्वर्य आहे
Comments
Add Comment

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

३ ऑगस्टला ब्रह्म मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, 'या' ५ राशींसाठी येणार आनंदाचे दिवस!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच सूर्य

खरी मैत्री काय असते ?

मैत्रीचे नाते या जगात सर्वात सुंदर मानले जाते, कारण या नात्यात रंग दिसत नाही, सौंदर्य नाही, पैसा नाही आणि भेदभाव

Vastu Tips: या दिशेला चुकूनही ठेवू नका पैसे, नाहीतर येऊ शकते आर्थिक संकट

मुंबई: वास्तूशास्त्रानुसार, घरात पैसे कोणत्या दिशेला ठेवले जातात, याला खूप महत्त्व आहे. जर पैसे चुकीच्या दिशेला

१ ऑगस्टला सूर्य-बुध युतीमुळे 'बुधादित्य योग'; 'या' राशींचे नशीब फळफळणार!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल आणि त्यांच्या युतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. १

Vastu Tips: 'या' वस्तू कधीही मोफत घेऊ नका, अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान!

मुंबई: आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण काही वस्तू दुसऱ्यांकडून मोफत घेतो किंवा भेट म्हणून स्वीकारतो. पण