फिटला संदेहो निमाले दुजेपण

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे सुंदर वर्णन केलेले आहे.

सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया

परमेश्वराचे जे पाहता येण्यासारखे रूप आहे ते त्यांनी डोळे भरून पाहिले पण परमेश्वर जसा आहे तसा कुणालाच पाहता येणार नाही, कुणी पाहिलेला नाही व यापुढे पाहता येणार नाही. मी समुद्राचे नेहमी उदाहरण देतो. समुद्र जसा आहे तसा आपल्याला पाहता येत नाही, पण समुद्र वरवर आपण पाहू शकतो. समुद्राच्या काठावर आपण बसलो की आपल्याला त्या किनाऱ्यापासून क्षितिजापर्यंत समुद्र आपल्याला पाहता येतो व आपण म्हणतो हा समुद्र पण समुद्र तेवढाच असतो का? दिसतो तो समुद्र व असतो तो समुद्र यात जमीन अासमानाइतके अंतर आहे.

सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे

तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया

 तो श्रीहरी आम्ही पाहिला, पण कसा पाहिला? समुद्र आपण पाहतो तसा पाहिला. त्याचे परिमित रूप जे आहे ते
आम्ही पाहिले.

अनंत रूपे अनंत
वेषे देखिले म्या त्यासी


बाप रखुमादेवीवरू
खूण बाणली ऐसी


देखिला देखिला
माये देवाचा देवो


फिटला संदेहो निमाले दुजेपण अनंत रुपांनी आपण त्याला पाहतोच आहोत, विश्वरूपाने तोच आहे, जगरूपाने तोच आहे, असंख्य जीवजंतूंच्या रूपाने तोच आहे. सांगायचा मुद्दा असा की, परमेश्वर सतत विस्तारीत आहे. “तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग’’ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत जो शब्द वापरलेला आहे तो किती वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. वैज्ञानिक जो शब्द आता वापरतात तोच ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे. वैज्ञानिक काय सांगतात? जग हे विस्तारत विस्तारत जाते. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात “तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग’’. विस्तार हा शब्द महत्त्वाचा आहे. माणसाचा जो विस्तार होतो ना त्यालाच संसार म्हणतात. एका व्यक्तीचा विस्तार होतो तोच संसार. हा वाईट आहे की चांगला? चांगला आहे. बायको, मुले, नातवंडे, पतवंडे असणे हे ऐश्वर्य आहे
Comments
Add Comment

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा

संत कबीर

पंडित होय के आसन मारे पंडित होय के आसन मारे, लंबी माला जपत है। अंतर तेरे कपट करतनी, सो भी साहब लिखता है ।। - डॉ.

महर्षी याज्ञवल्क्य 

भारतीय ऋषी वैशंपायनांच्या आश्रमातून सांजसमयी बाहेर पडलेले याज्ञवल्क्य पूर्ण रात्रभर चालतच होते. अरुणोदयाच्या

सत्संग : अंतर्मुखतेकडून आत्मोन्नतीकडे

प्राची परचुरे वैद्य मानवी जीवन हे केवळ भौतिक गरजांच्या पूर्ततेपुरते मर्यादित नसून ते विचार, मूल्ये, भावना आणि

तृतीयपंथियांचा आक्रोश

ऋतुराज ऋतुजा राजेश केळकर अचानक एक बाळाचा आक्रोश हवेत पसरला आणि सगळे थरारले. तिसऱ्या मजल्यावरील बंद घरातून तो

आत्मबोधाचा शाश्वत आनंद

अर्चना सरोदे मातेच्या गर्भात असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा हा जीव