पंतप्रधान मोदींचा युरोपीय देशांचा परदेश दौरा रद्द

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतातर्फे 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ तळं नष्ट केले. यामुळे सीमेवरील तणाव अधिकच वाढला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड या युरोपीय देशांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.


भारताने पाकिस्‍तानवर केलेल्‍या एअर स्‍ट्राईकचे पंतप्रधान मोदी हे मॉनिटरींग करत होते. यावेळी त्‍यांच्यासोबत अजित डोवालही उपस्‍थित होते. ते पीएम मोदी यांना प्रत्‍येक वेळेची अपडेट देत होते. त्यामुळे हल्ल्यामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी ७, कल्‍याण मार्ग येथून या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हे त्‍यांना प्रत्‍येक क्षणाची माहिती देत होते.



जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. पहलगाम हल्याच्या १४ दिवसांनंतर, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले.


भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत.


दरम्यान पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (सीसीएस) बैठक घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूर नंतरच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने