Operation Sindoor: मॉक ड्रिलवर लक्ष ठेवून होता पाकिस्तान, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' चालवले

जम्मू आणि काश्मीर: पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानी दहशतवाद्यांनी १५ दिवसांपूर्वी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय महिलांच्या कपाळावरून पुसलेल्या सिंदूरचा बदला भारताने घेण्यास सुरुवात केली आहे. ७ मे च्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. संपूर्ण पाकिस्तानचे लक्ष भारतात विविध ठिकाणी होणाऱ्या मॉक ड्रिलकडे असतानाच भारताने चढवलेला हमला पाकड्यांची भंबेरी उडवणारा ठरला.



ऑपरेशन सिंदूर  (Operation Sindoor) अंतर्गत, या ठिकाणी भारताने चढवले हल्ले


यामध्ये दहशतवाद्याचा म्होरक्या हाफिज सईद आणि मसूद अझहरच्या लपण्याच्या ठिकाणांचा देखील समावेश आहे. आतापर्यंतच्या अपडेट्सनुसार, भारताने मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, कोटली, बाग, गुलपूर, भिंबर आणि शकरगढ येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून केलेल्या या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नामशेष झाल्या आहेत. यासह सैन्याने न्याय झाला असे जाहीर करत, या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे म्हंटले.



भारताने कुठे कारवाई केली?


पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या घातल्या होत्या. हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर ६ आणि ७ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी लपलेले आहेत त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

Comments
Add Comment

PM NARENDRA MODI : "भारताची क्रीडा क्षेत्रातील घोडदौड थक्क करणारी": पंतप्रधान मोदींनी युवा खेळाडूंना दिले 'ऑलिम्पिक'चे मोठे लक्ष्य

NEW DELHI : भारतीय खेळाडूंची जागतिक स्तरावरील कामगिरी आणि देशातील क्रीडा संस्कृतीचा वाढता विस्तार, यावर पंतप्रधान

FIFA World Cup 2026 : भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! कुठे पाहता येणार सामने, किती आहे सबस्क्रिप्शन फी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कप २०२६ आज (११ जून ) पासून सुरु

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील

Jaigad Port : रत्नागिरीतील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

 कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

Gold Silver Today Rate : आनंदवार्ता! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; MCX वर चांदी ५,८०० तर सोनं १,५०० रुपयांनी स्वस्त

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू असून गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा मौल्यवान धातूंच्या

ICC ODI Rankings : भारत पुन्हा नंबर वन ! टी-२० आणि एकदिवसीय मध्ये वर्चस्व कायम

मुंबई :आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नुकताच आयसीसी रँकिंग जाहिर केली आहे.यात भारतीय संघाने