Operation Sindoor : भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला,रात्री १.३० वाजता एअरस्ट्राईक आणि रडत राहिला पाकिस्तान

  114

नवी दिल्ली: २२ एप्रिल २०२५, तो काळा दिवस जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे २६ निर्दोष लोकांना मारले. केवळ जीवच घेतला नाही तर असे घाणेरडे कृत्य केले ज्याने संपूर्ण मानवतेला काळिमा फासला जाईल. ज्या निर्दोष लोकांना मारण्यात आले त्यांना त्यांचा आधी धर्म विचारण्यात आला.


या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश केंद्रातील मोदी सरकारकडून दहशतवादाविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी करत होता. प्रत्येकाला वाटत होते निर्दोष लोकांच्या मृत्यूचा बदला भारतीय लष्करांने या दहशतवाद्यांना मारून घ्यावा.


हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे दहशतवादाविरोधात कडक कारवाईची घोषणा केली होती. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही उद्ध्वस्त केली जाईल. मोदी म्हणाले होते की प्रत्येक दहशतवादी आणि त्याचे समर्थन करणाऱ्या ओळख पटवेल आणि त्याला शिक्षा दिली जाईल. दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आलीये



मधुबनीमध्ये दिलेला शब्द झाला पूर्ण


७ एप्रिल २०२५ ही तारीख जी पाकिस्तान नेहमी लक्षात ठेवेल. दहशतवादाच्या पनाहगर पाकिस्ताना भारतीय सैन्याने एकामागोमाग एक ९ एअरस्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.



रात्री १.४४ वाजता दिली एअरस्ट्राईकची माहिती, रडत राहिला पाकिस्तान


भारताच्या सशस्त्र दलांनी पहलगाम हल्ल्यानंतर दोन आठवड्यानंतर कडक कारवाई करताना मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर मिसाईलने हल्ला केला. यात दहशतवादी लष्कर-ए-मोहम्मदचा गड बहावलपूरचाही समावेश आहे.


संरक्षण मंत्रालयाने रात्री उशिरा १.४४ वाजता एका विधानात म्हटले की लष्कराने हे हल्ले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केले आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.