Operation Sindoor : भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला,रात्री १.३० वाजता एअरस्ट्राईक आणि रडत राहिला पाकिस्तान

नवी दिल्ली: २२ एप्रिल २०२५, तो काळा दिवस जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे २६ निर्दोष लोकांना मारले. केवळ जीवच घेतला नाही तर असे घाणेरडे कृत्य केले ज्याने संपूर्ण मानवतेला काळिमा फासला जाईल. ज्या निर्दोष लोकांना मारण्यात आले त्यांना त्यांचा आधी धर्म विचारण्यात आला.


या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश केंद्रातील मोदी सरकारकडून दहशतवादाविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी करत होता. प्रत्येकाला वाटत होते निर्दोष लोकांच्या मृत्यूचा बदला भारतीय लष्करांने या दहशतवाद्यांना मारून घ्यावा.


हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथे दहशतवादाविरोधात कडक कारवाईची घोषणा केली होती. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही उद्ध्वस्त केली जाईल. मोदी म्हणाले होते की प्रत्येक दहशतवादी आणि त्याचे समर्थन करणाऱ्या ओळख पटवेल आणि त्याला शिक्षा दिली जाईल. दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आलीये



मधुबनीमध्ये दिलेला शब्द झाला पूर्ण


७ एप्रिल २०२५ ही तारीख जी पाकिस्तान नेहमी लक्षात ठेवेल. दहशतवादाच्या पनाहगर पाकिस्ताना भारतीय सैन्याने एकामागोमाग एक ९ एअरस्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.



रात्री १.४४ वाजता दिली एअरस्ट्राईकची माहिती, रडत राहिला पाकिस्तान


भारताच्या सशस्त्र दलांनी पहलगाम हल्ल्यानंतर दोन आठवड्यानंतर कडक कारवाई करताना मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर मिसाईलने हल्ला केला. यात दहशतवादी लष्कर-ए-मोहम्मदचा गड बहावलपूरचाही समावेश आहे.


संरक्षण मंत्रालयाने रात्री उशिरा १.४४ वाजता एका विधानात म्हटले की लष्कराने हे हल्ले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केले आहे.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या