शिर्डीत ३.७५ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त; शहरात खळबळ

  42

शिर्डी : प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीत अवैध गुटख्याचा साठा आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) संयुक्त कारवाईत तब्बल ३,७५,००० किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गणेशवाडी परिसरातील आनंद निवास या ठिकाणी करण्यात आली.


?si=akom3h0WuXUHP445

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद निवास येथे धाड टाकली असता, एका बंद खोलीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि संबंधित साहित्य आढळून आला. या साठ्यामध्ये नामांकित कंपन्यांच्या पॅकेट्सचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत ३.७५ लाखांवर गेल्याची प्राथमिक माहिती आहे.



गुटखा विक्री आणि साठवणूक महाराष्ट्रात पूर्णतः बंद असूनही, इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी गुटखा साठवण्यात आल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शिर्डी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष पंचनामा केला.


या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात अन्न सुरक्षा कायदा आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, गुटख्याचा साठा कुठून आला आणि तो कुणासाठी ठेवण्यात आला होता, याचा तपास सुरू आहे.


शहरातील श्रद्धाळूंच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर गुटख्यासारख्या प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळणं ही चिंताजनक बाब असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी