मिठी प्रकल्पात ६५ कोटींचा अपहार; बीएमसीचे ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३ दलाल आणि २ खाजगी कंपनी प्रतिनिधी अशा एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

१००० कोटींचा संशयित घोटाळा


मुंबई : मुंबईतील मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील मोठा घोटाळा उघड झाला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ५ ठेकेदार, ३ बीएमसी अधिकारी, ३ दलाल आणि २ खाजगी कंपनी प्रतिनिधी अशा एकूण १३ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.


या आरोपींनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला तब्बल ६५.५४ कोटींचा आर्थिक फटका दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील एकूण घोटाळा १००० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.


आज सकाळपासून विशेष तपास पथकाने मुंबईतील ८–९ ठिकाणी छापे टाकले, ज्यामध्ये ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांचे घर व कार्यालये तपासली जात आहेत. विशेष तपास पथकाच्या प्राथमिक तपासावर आधारित गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



या कारवाईत कै. काशिवाल (कैलाश कन्स्ट्रक्शन), ऋषभ जैन (अक्युट एन्टरप्रायझेस), आणि शेरसिंह (मंदीप एन्टरप्रायझेस) या तीन ठेकेदारांना समन्स बजावण्यात आले आहेत.


२००५ पासून सुरू असलेल्या १७.८ किमी लांब मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रकल्पावर १३०० कोटी खर्च करण्यात आले. या पैशांचा उपयोग खरोखर झाला का, की तो खोट्या करारपत्रांच्या आधारे अपहार केला गेला, हे तपासण्यात येत आहे.


आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त व्ही. डी. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :