नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या शाळेसाठी शिक्षक सज्ज

  42

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पटसंख्येच्या तुलनेत आकृतीबंध नियमानुसार आवश्यक शिक्षकांची पूर्ण पदे असल्याने आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शाळेचे शिक्षक सज्ज झाले आहेत. मीरा-भाईंदर शहरातील आदिवासी पाडे, ग्रामीण भाग यातील सर्वसामान्य पालक आपल्या पाल्यांना पालिकेच्या शाळेत पाठवतात.



शहरात महापालिकेच्या ३६ शाळा असून त्यात २२ मराठी माध्यमाच्या, ४ हिंदी माध्यमाच्या, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी ५ असा सामावेश असून ८,५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी १४३ शिक्षक कार्यरत आहेत. महापालिकेच्या आकृतीबंध नियमानुसार २२५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. महापालिकेने १४३ स्थायी शिक्षकांसोबत ६३ शिक्षण सेवक, ३५ ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिक्षकांची संख्या २४१ झाली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी महापालिकेचे शिक्षक सज्ज झाले आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत