स्टेशन ठाकूरवाडी शाळा सौर दिव्यांनी उजळली

कर्जत : कर्जत तालुक्यात पुणे जिल्हा लगतचे शेवटचे गाव असलेल्या मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील स्टेशन ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे आवार सौर दिव्यांनी उजळून गेले आहे. चिराग फाऊंडेशन या संस्थेने गावातील चौक उजळविण्यासाठी शाळेसाठी असे एकूण सहा सौर दिवे दिले आहेत. शाळेच्या आवारातील रात्रीच्या वेळी दिव्याचा प्रकाश पाहून हे सौर दिवे कोणी बसवले असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.



ठाकूरवाडी जिल्हा परिषदेची शाळा रात्रीच्या वेळी अंधारात असते. शाळेच्या परिसरात मोठी मोकळी जागा असून देखील रात्रीच्या वेळी अंधार असल्याने तेथे गप्पा मारण्यासाठी किंवा कोणते खेळ खेळण्यासाठी कोणालाही बसता येत नाही. ही समस्या चिराग फाऊंडेशन या संस्थेकडे राज्यातील प्रयोगशील शिक्षक वेच्या गावित यांच्याकडून उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर चिराग फाऊंडेशन चे काही पदाधिकारी स्टेशन ठाकूरवाडी मध्ये आले आणि त्यांनी गावाची पाहणी केली. गावात वीज आहे पण गावातील लोकवस्ती मधील चौक हे कायम अंधारात आहेत, तसेच शाळेच्या आवारातील अंधार पाहून एक नाहीतर चक्क सहा सौर ऊर्जेवर चालणारी दिवे भेट देण्याचा निर्णय या फाऊंडेशनने घेतला.



मोलमजुरी करणारे स्टेशन ठाकूरवाडी गावातील ग्रामस्थ दिवसा बाहेर असतात. त्यांच्या अनुपस्थितीत चिराग फाऊंडेशनचे कार्यकर्ते सोलर पॅनल घेऊन पोहोचले आणि त्यांनी सिमेंट खडी यांच्या साहाय्याने सर्व सहा सौर दिवे बसवून गावातून आपले कामाचे ठिकाण गाठले. . शाळेतील संजय राठोड, ज्ञानेश्वर येळदरे याकामी सहकारी शिक्षकांचे योगदान मोलाचे राहिले आहे.

Comments
Add Comment

Minor Girl Abuse Case : धक्कादायक! कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; पित्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसून येत आहे.

NEET Paper Leak : मॉडर्न कॉलेजकडून मोठी कारवाई! प्राध्यापिका मनीषा मांढरे अखेर निलंबित

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला