पुणे विभागाच्या निकालात तीन टक्क्यांहून अधिक घट

पुणे :राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेच्या निकालात पुणे जिल्हयाने बाजी मारली. पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल लागला. यानंतर सोलापूर जिल्ह्याचा ८८.६२ टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के निकाल लागला. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.



पुणे विभागात २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. तर २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्हाच अव्वल स्थानी होता. पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याचा परिणाम पुणे विभागाच्या निकालात देखील दिसून आला. गैरमार्ग प्रकरणांची संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले. गतवर्षी ९५ इतके गैरमार्ग प्रकरणांची मंडळाकडे नोंद झाली. तर यंदा ६६ इतके गैरमार्ग प्रकरणे नोंदविण्यात आली.




पुणे जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले, तर १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.



लिंगनिहाय निकालामध्ये पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला. अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला. सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९७.०१ टक्के इतका लागला. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के इतका तर कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के इतका लागला. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के आणि तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के इतका लागला.

Comments
Add Comment

Minor Girl Abuse Case : धक्कादायक! कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; पित्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसून येत आहे.

NEET Paper Leak : मॉडर्न कॉलेजकडून मोठी कारवाई! प्राध्यापिका मनीषा मांढरे अखेर निलंबित

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला