पुणे विभागाच्या निकालात तीन टक्क्यांहून अधिक घट

पुणे :राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेच्या निकालात पुणे जिल्हयाने बाजी मारली. पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल लागला. यानंतर सोलापूर जिल्ह्याचा ८८.६२ टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के निकाल लागला. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.



पुणे विभागात २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. तर २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्हाच अव्वल स्थानी होता. पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याचा परिणाम पुणे विभागाच्या निकालात देखील दिसून आला. गैरमार्ग प्रकरणांची संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले. गतवर्षी ९५ इतके गैरमार्ग प्रकरणांची मंडळाकडे नोंद झाली. तर यंदा ६६ इतके गैरमार्ग प्रकरणे नोंदविण्यात आली.




पुणे जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले, तर १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.



लिंगनिहाय निकालामध्ये पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला. अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला. सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९७.०१ टक्के इतका लागला. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के इतका तर कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के इतका लागला. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के आणि तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के इतका लागला.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण