पुणे विभागाच्या निकालात तीन टक्क्यांहून अधिक घट

पुणे :राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेच्या निकालात पुणे जिल्हयाने बाजी मारली. पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल लागला. यानंतर सोलापूर जिल्ह्याचा ८८.६२ टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के निकाल लागला. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.



पुणे विभागात २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. तर २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्हाच अव्वल स्थानी होता. पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याचा परिणाम पुणे विभागाच्या निकालात देखील दिसून आला. गैरमार्ग प्रकरणांची संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले. गतवर्षी ९५ इतके गैरमार्ग प्रकरणांची मंडळाकडे नोंद झाली. तर यंदा ६६ इतके गैरमार्ग प्रकरणे नोंदविण्यात आली.




पुणे जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले, तर १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.



लिंगनिहाय निकालामध्ये पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला. अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला. सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९७.०१ टक्के इतका लागला. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के इतका तर कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के इतका लागला. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के आणि तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के इतका लागला.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि