पुणे विभागाच्या निकालात तीन टक्क्यांहून अधिक घट

पुणे :राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेच्या निकालात पुणे जिल्हयाने बाजी मारली. पुणे जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल लागला. यानंतर सोलापूर जिल्ह्याचा ८८.६२ टक्के तर अहिल्यानगर जिल्ह्याचा ८६.३४ टक्के निकाल लागला. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.



पुणे विभागात २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. तर २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्हाच अव्वल स्थानी होता. पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याचा परिणाम पुणे विभागाच्या निकालात देखील दिसून आला. गैरमार्ग प्रकरणांची संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले. गतवर्षी ९५ इतके गैरमार्ग प्रकरणांची मंडळाकडे नोंद झाली. तर यंदा ६६ इतके गैरमार्ग प्रकरणे नोंदविण्यात आली.




पुणे जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले, तर १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. तर ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.



लिंगनिहाय निकालामध्ये पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला. अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला. सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला. विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९७.०१ टक्के इतका लागला. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के इतका तर कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के इतका लागला. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के आणि तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के इतका लागला.

Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील