अतिरेक्यांना मदत करणाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

श्रीनगर : पहलगाममध्ये हल्ला करुन २६ नागरिकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना अन्न, पाणी आदी स्वरुपाची मदत करणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.



सुरक्षा पथकाला अतिरेक्यांच्या मदतनिसाविषयी ठोस माहिती मिळताच कारवाई सुरू केली. अटकेची जाणीव होताच अतिरेक्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पळायला सुरुवात केली. घनदाट जंगलातून सुरक्षा पथकांना चकवण्याचा प्रयत्न त्याने केला. पण सुरक्षा पथकाचे जवान त्याला पकडण्यासाठी पाठलाग करत होते. अखेर पळणे कठीण आहे असे जाणवू लागताच जवळून वाहणाऱ्या नदीत उडी टाकून तरुणाने सुरक्षित अंतर गाठण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नदीमार्गे पळण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला. सुरक्षा पथकाने नदीच्या प्रवाहातून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

जम्मू काश्मीरमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुण घनदाट जंगलातून पळत नदीत उडी मारताना दिसत आहे. याच तरुणाने अतिरेक्यांना मदत केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. मृत तरुणाचे नाव इम्तियाज अहमद मगरे असे आहे. तो २३ वर्षांचा होता. इम्तियाज कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा भागातील तंगमार्ग येथील राहणारा होता. पैशांसाठी तंगमार्ग येथील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना जेवणं आणि निवारा दिला होता.

नवा वाद भडकला

सुरक्षा पथक इम्तियाज नदीत बुडून मेल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात इम्तियाजला सुरक्षा पथकाने अटक केली होती. नंतर चौकशी झाल्यावर त्याला पाण्यात बुडवून मारण्यात आले; असा आरोप पॉप्युलर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी केला.
Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन