विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट नको : चंद्रशेखर बावनकुळे

पुरंदर :पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या भू संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध होतोय. शेतकऱ्यांनी ३ मे रोजी केलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले. त्यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनुकळेंनी सोमवारी माध्यमांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा, असे बावनकुळे म्हणाले.



यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आज भूसंपादनाला विरोध करणाऱ्या अनेक मान्यवरांशी केली. त्यांची मागणी आहे की, शेतकऱ्यांविरुद्ध नोंदवले गेलेले जे गुन्हे आहेत, ते कमी झाले पाहिजे. पण, काही अधिकाऱ्यांना स्थानिकांनी मारहाण झाली, त्याचे काही व्हिडिओ आहेत. या गुन्ह्यात जे लोक प्रत्यक्षी सहभागी आहेत, त्यांचा वेगळा विचार करायला लागले. जे निरापराध आहेत, त्यांचे गुन्हे कमी करू, याबाबत मी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याशी चर्चा करेन.




पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांची पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाही, अशी भूमिका आहे. मी त्यांना समजावले. पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. शेतकऱ्यांचा माल आंतराष्ट्रीय स्तरावर निर्यात होऊ शकतो. विकासाच्या बाबतीत मुंबई आणि दिल्लीनंतर पुण्याचा नंबर लागलो. त्यासाठी हे विमानतळ करण्याचा मानस आहे.आणि ही भूमिका सरकार बदलणार नाही, सरकार विमानतळ करणारच आहे. तुम्हाला जमीन द्यायची नाही पण सरकारला हवी. त्यामुळं मी शेतकऱ्यांना विनंती करतो की, तुमच्या मागण्या काय आहेत, तुम्ही सात दिवसांच्या आत सांगा. शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी, असं सांगत पुरंदर विमानतळाच्या बाबत सुरू असलेले सर्वेक्षण थांबवले असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.



काहींनी चुकीच्य रेट डिक्लेअर केला. पण, तिढा सुटावा, यासाठी आम्ही शेतकऱ्यांशी पंधरा दिवसांनी दिवसांनी चर्चा करू. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू कायम राहावे,हीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचे नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा, असे बावनकुळे म्हणाले.


Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य