तंदुरी रोटीमुळे दोन तरूणांनी गमावला जीव, नेमके घडले तरी काय?

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे एका लग्न समारंभादरम्यान तंदुरी रोटी आधी घेण्यावरून झालेल्या वादात दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले. ही धक्कादायक घटना बलभद्रपूर गावात घडली. येथे एका शुल्लक गोष्टीने हिंसक रूप गाठले आणि कुटुंबाचा आनंद दु:खात रुपांतरित झाला.


खरंतर ही घटना शनिवार संध्याकाळची आहे. येथे बलभद्रपूर गावात राहणारे रामजियावन वर्मा यांच्या मुलीचे लग्न होते. वरात शांततेत आली होती. तसेच लग्नाच्या प्रथा सुरू होत्या. मात्र जशी जेवण्याची वेळ झाली आणि तंदुरी रोटी वाढायला सुरूवात करण्यात आली. या दरम्यान १८ वर्षीय रवी कुमार उर्फ कल्लू आणि १७ वर्षीय युवक आशिष कुमार यांच्यात वादावादी सुरू झाली. हा शुल्लक वाद पाहता पाहता इतका वाढला की दोन्ही तरूण काठीने हाणामारी करू लागले.


या हिंसक वादात आशिषचा जागीच मृत्यू झाला तर गंभीररित्या जखमी झालेल्या रवीला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या बातमीमुळे आनंदी कुटुंबामध्ये शोकाचे वातावरण पसरले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत.

Comments
Add Comment

Airport Rules: एअरपोर्टवर Reels आणि Selfie काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; नियम मोडल्यास होऊ शकते कारवाई

सोशल मीडियाच्या (Social Media) वाढत्या वापरामुळे अनेक जण प्रवासादरम्यान सेल्फी, रील्स आणि व्हिडिओ तयार करताना दिसतात.

Two Eclipses In 15 Days : एकाच महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण; ऑगस्ट २०२६ मध्ये दुर्मिळ खगोलीय योग!

मुंबई : वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन मोठ्या खगोलीय घटना ऑगस्ट २०२६ मध्ये

Bihar Hospital Fire : बिहारमधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

बिहार : बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) (ICU) लागलेल्या भीषण

Delhi's Malviya Nagar Fire : दिल्लीतील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी अंत

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील फ्लोरिश स्टे बी अँड बी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी

दिल्लीतील हॉटेलमध्ये भीषण आग; अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग (Massive Fire)