तंदुरी रोटीमुळे दोन तरूणांनी गमावला जीव, नेमके घडले तरी काय?

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे एका लग्न समारंभादरम्यान तंदुरी रोटी आधी घेण्यावरून झालेल्या वादात दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले. ही धक्कादायक घटना बलभद्रपूर गावात घडली. येथे एका शुल्लक गोष्टीने हिंसक रूप गाठले आणि कुटुंबाचा आनंद दु:खात रुपांतरित झाला.


खरंतर ही घटना शनिवार संध्याकाळची आहे. येथे बलभद्रपूर गावात राहणारे रामजियावन वर्मा यांच्या मुलीचे लग्न होते. वरात शांततेत आली होती. तसेच लग्नाच्या प्रथा सुरू होत्या. मात्र जशी जेवण्याची वेळ झाली आणि तंदुरी रोटी वाढायला सुरूवात करण्यात आली. या दरम्यान १८ वर्षीय रवी कुमार उर्फ कल्लू आणि १७ वर्षीय युवक आशिष कुमार यांच्यात वादावादी सुरू झाली. हा शुल्लक वाद पाहता पाहता इतका वाढला की दोन्ही तरूण काठीने हाणामारी करू लागले.


या हिंसक वादात आशिषचा जागीच मृत्यू झाला तर गंभीररित्या जखमी झालेल्या रवीला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या बातमीमुळे आनंदी कुटुंबामध्ये शोकाचे वातावरण पसरले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत.

Comments
Add Comment

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात