तंदुरी रोटीमुळे दोन तरूणांनी गमावला जीव, नेमके घडले तरी काय?

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे एका लग्न समारंभादरम्यान तंदुरी रोटी आधी घेण्यावरून झालेल्या वादात दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले. ही धक्कादायक घटना बलभद्रपूर गावात घडली. येथे एका शुल्लक गोष्टीने हिंसक रूप गाठले आणि कुटुंबाचा आनंद दु:खात रुपांतरित झाला.


खरंतर ही घटना शनिवार संध्याकाळची आहे. येथे बलभद्रपूर गावात राहणारे रामजियावन वर्मा यांच्या मुलीचे लग्न होते. वरात शांततेत आली होती. तसेच लग्नाच्या प्रथा सुरू होत्या. मात्र जशी जेवण्याची वेळ झाली आणि तंदुरी रोटी वाढायला सुरूवात करण्यात आली. या दरम्यान १८ वर्षीय रवी कुमार उर्फ कल्लू आणि १७ वर्षीय युवक आशिष कुमार यांच्यात वादावादी सुरू झाली. हा शुल्लक वाद पाहता पाहता इतका वाढला की दोन्ही तरूण काठीने हाणामारी करू लागले.


या हिंसक वादात आशिषचा जागीच मृत्यू झाला तर गंभीररित्या जखमी झालेल्या रवीला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या बातमीमुळे आनंदी कुटुंबामध्ये शोकाचे वातावरण पसरले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत.

Comments
Add Comment

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक

Middle East War : इराण-इस्रायल युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, १० सैनिकही जखमी!

कुवेत सिटी : मध्य-पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक व्यापक आणि हिंसक बनत चालला आहे. या

Shabbir Ahmed Lone LeT Terrorist Arrest : लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड जेरबंद, लाल किल्ला हादरवण्याचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत

आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना

नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे

Maan ki Baat, Narendra Modi : "मन की बात"मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'

भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही