शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर 'सर्वोच्च' सुनावणी

नवी दिल्ली : पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह या वादावर तोडगा काढून निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले. तसेच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे जाहीर केले. या निर्णयांविरोधात उद्धव आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मे महिन्यात उद्धव आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे


उद्धव गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे / शिउबाठा) शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी शिवसेना कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्यबाण वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.


शरद पवार गट (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार / राशप) राष्ट्रवादी काँग्रेस या नावावर आणि गजराचे घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि गजराचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात १४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून गजराचे घड्याळ वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने