शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर 'सर्वोच्च' सुनावणी

नवी दिल्ली : पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह या वादावर तोडगा काढून निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले. तसेच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे जाहीर केले. या निर्णयांविरोधात उद्धव आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मे महिन्यात उद्धव आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे


उद्धव गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे / शिउबाठा) शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी शिवसेना कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्यबाण वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.


शरद पवार गट (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार / राशप) राष्ट्रवादी काँग्रेस या नावावर आणि गजराचे घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा करत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि गजराचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षाचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात १४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आणि कोणत्या पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून गजराचे घड्याळ वापरता येईल याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.