आसाम : पाकिस्तान समर्थक ३७ देशद्रोह्यांना अटक

दिसपूर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ हिंदूंच्या ‘टार्गेट किलींग’नंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आसाममध्ये पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या ३७ देशद्रोहींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर (एक्स) याबाबत माहिती दिली.


मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत एकूण ३७ देशद्रोहींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सर्व देशद्रोह्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहलगाम हल्ल्यानंतर काही लोक सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून पाकिस्तानला पाठिंबा देणारी विधाने करत होते.

या विधानांना गांभीर्याने घेत, आसाम पोलिसांनी तपास सुरू केला आणि आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून ३७ जणांना अटक केली आहे. आसाम सरकार कोणतेही देशविरोधी वर्तन सहन करणार नाही. देशाच्या एकता आणि अखंडतेशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कुणीही देशविरोधी टिप्पणी किंवा कृती केल्याचे आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. राज्यात शांतता आणि सुरक्षा राखली जावी आणि कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी विचारांना प्रोत्साहन दिले जाऊ नये, असा सरकारचा हेतू असल्याचेही त्यांनी ठणकावले आहे.

Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत