Vijay Deverakonda : वाद वाढल्यानंतर विजय देवरकोंडाचे यूटर्न! आदिवासींवरील वक्तव्याबद्दल मागितली माफी!

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने अलीकडेच आदिवासींविषयी एक चुकीचं विधान केलं होत, त्या घटनेमुळे त्याच्यावर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. विजयने या संपूर्ण प्रकरणात माफी मागितली आहे आणि स्पष्टीकरण दिले आहे. विजयने त्याच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.


विजय लिहितो- 'रेट्रो ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान मी केलेल्या टिप्पण्यांबद्दल काही लोकांनी चिंता व्यक्त केल्याचे माझ्या लक्षात आले आहे. मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की कोणत्याही समुदायाला, विशेषतः अनुसूचित जमातींना दुखावण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी त्यांचा मनापासून आदर करतो आणि त्यांना आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो.


विजय पुढे लिहितो की तो त्या कार्यक्रमात भारतीयांमधील एकतेबद्दल बोलत होता. 'मी एकतेबद्दल बोलत होतो, भारत कसा एक आहे. आपले लोक एक आहेत आणि आपण एकत्र कसे पुढे जायला हवे.त्याने लिहिले, 'कोणत्या जगात, आपल्या सर्वांना एक राष्ट्र म्हणून एकजूट राहण्याचे आवाहन करताना, मी भारतीयांच्या कोणत्याही गटाशी, ज्यांना मी माझे कुटुंब, माझे भाऊ मानतो, जाणूनबुजून भेदभाव करेन?'


विजयने जमाती हा शब्द वापरताना त्याचा अर्थ काय होता हे देखील स्पष्ट केले. अभिनेता लिहितो, 'मी 'जमाती' हा शब्द ऐतिहासिक आणि शब्दकोशाच्या अर्थाने वापरला. हे शतकांपूर्वीच्या काळाचे वर्णन करते जेव्हा जागतिक स्तरावर मानवी समाज जमाती आणि कुळांमध्ये संघटित होता, जे अनेकदा संघर्षात असत.'




विजयने त्याच्या स्पष्टीकरणात इंग्रजी शब्दकोशानुसार जमातीचा अर्थ देखील स्पष्ट केला आहे. तो म्हणाला, 'इंग्रजी शब्दकोशानुसार, 'जमाती' म्हणजे- 'पारंपारिक समाजातील एक सामाजिक विभाग ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक किंवा रक्ताच्या नात्यांद्वारे जोडलेले कुटुंबे किंवा समुदाय असतात आणि त्यांची संस्कृती आणि भाषा समान असते.' माझ्या संदेशातील कोणत्याही भागाचा गैरसमज झाला असेल तर मी मनापासून माफी मागतो.



काय होते विजय देवरकोंडाचे वक्तव्य


रेट्रो प्री-रिलीज कार्यक्रमात विजय देवरकोंडा पहलगाम हल्ल्यावर म्हणाले होते की, काश्मीरमध्ये जे घडत आहे त्यावर उपाय म्हणजे दहशतवाद्यांना शिक्षित करणे आणि त्यांचे ब्रेनवॉश होणार नाही याची खात्री करणे. ते काय साध्य करतील? काश्मीर भारताचे आहे. काश्मीर आमचे आहे. भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचीही गरज नाही कारण पाकिस्तानी स्वतः त्यांच्या सरकारला कंटाळले आहेत. जर हे असेच चालू राहिले तर ते स्वतः त्यांच्यावर हल्ला करतील. खरं तर, ज्याप्रमाणे आदिवासी ५०० वर्षांपूर्वी लढत असत, त्याचप्रमाणे हे लोकही कोणत्याही बुद्धिमत्तेशिवाय आणि समजुतीशिवाय तेच काम करत आहेत.

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत