Vijay Deverakonda : वाद वाढल्यानंतर विजय देवरकोंडाचे यूटर्न! आदिवासींवरील वक्तव्याबद्दल मागितली माफी!

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने अलीकडेच आदिवासींविषयी एक चुकीचं विधान केलं होत, त्या घटनेमुळे त्याच्यावर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. विजयने या संपूर्ण प्रकरणात माफी मागितली आहे आणि स्पष्टीकरण दिले आहे. विजयने त्याच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.


विजय लिहितो- 'रेट्रो ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान मी केलेल्या टिप्पण्यांबद्दल काही लोकांनी चिंता व्यक्त केल्याचे माझ्या लक्षात आले आहे. मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की कोणत्याही समुदायाला, विशेषतः अनुसूचित जमातींना दुखावण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी त्यांचा मनापासून आदर करतो आणि त्यांना आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो.


विजय पुढे लिहितो की तो त्या कार्यक्रमात भारतीयांमधील एकतेबद्दल बोलत होता. 'मी एकतेबद्दल बोलत होतो, भारत कसा एक आहे. आपले लोक एक आहेत आणि आपण एकत्र कसे पुढे जायला हवे.त्याने लिहिले, 'कोणत्या जगात, आपल्या सर्वांना एक राष्ट्र म्हणून एकजूट राहण्याचे आवाहन करताना, मी भारतीयांच्या कोणत्याही गटाशी, ज्यांना मी माझे कुटुंब, माझे भाऊ मानतो, जाणूनबुजून भेदभाव करेन?'


विजयने जमाती हा शब्द वापरताना त्याचा अर्थ काय होता हे देखील स्पष्ट केले. अभिनेता लिहितो, 'मी 'जमाती' हा शब्द ऐतिहासिक आणि शब्दकोशाच्या अर्थाने वापरला. हे शतकांपूर्वीच्या काळाचे वर्णन करते जेव्हा जागतिक स्तरावर मानवी समाज जमाती आणि कुळांमध्ये संघटित होता, जे अनेकदा संघर्षात असत.'




विजयने त्याच्या स्पष्टीकरणात इंग्रजी शब्दकोशानुसार जमातीचा अर्थ देखील स्पष्ट केला आहे. तो म्हणाला, 'इंग्रजी शब्दकोशानुसार, 'जमाती' म्हणजे- 'पारंपारिक समाजातील एक सामाजिक विभाग ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक किंवा रक्ताच्या नात्यांद्वारे जोडलेले कुटुंबे किंवा समुदाय असतात आणि त्यांची संस्कृती आणि भाषा समान असते.' माझ्या संदेशातील कोणत्याही भागाचा गैरसमज झाला असेल तर मी मनापासून माफी मागतो.



काय होते विजय देवरकोंडाचे वक्तव्य


रेट्रो प्री-रिलीज कार्यक्रमात विजय देवरकोंडा पहलगाम हल्ल्यावर म्हणाले होते की, काश्मीरमध्ये जे घडत आहे त्यावर उपाय म्हणजे दहशतवाद्यांना शिक्षित करणे आणि त्यांचे ब्रेनवॉश होणार नाही याची खात्री करणे. ते काय साध्य करतील? काश्मीर भारताचे आहे. काश्मीर आमचे आहे. भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचीही गरज नाही कारण पाकिस्तानी स्वतः त्यांच्या सरकारला कंटाळले आहेत. जर हे असेच चालू राहिले तर ते स्वतः त्यांच्यावर हल्ला करतील. खरं तर, ज्याप्रमाणे आदिवासी ५०० वर्षांपूर्वी लढत असत, त्याचप्रमाणे हे लोकही कोणत्याही बुद्धिमत्तेशिवाय आणि समजुतीशिवाय तेच काम करत आहेत.

Comments
Add Comment

Sanchita Ugale : संध्याकाळी साडेपाच नंतर असं काय घडलं की संचिताने टोकाचं पाऊल उचललं ?

नालासोपारा : 'वागळे की दुनिया' आणि 'कुमकुम भाग्य' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली

Sanchita Ugale Suicide Case : संचिता उगलेच्या आत्महत्येचे सुशांत सिंग राजपूतशी कनेक्शन ?

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येबाबात तिच्या वडिलांनी संशय व्यक्त केला नसला तरी तिच्या चुलत भावाने एका

Dilip Prabhavalkar : ज्येष्ठ नाट्य-सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचा विशेष गौरव

- नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला शासन मदत करणार मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित

धक्कादायक! कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगले हीची आत्महत्या

-राहत्या घरात गळफास घेऊन संपले जीवनयात्रा मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय

Mohsin Akhtar Mir : उर्मिला मातोंडकरचा एक्स-हसबंड मोहसिन अख्तरचा दुसरा विवाह; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांचे एक्स-हसबंड मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir ) यांनी दुसरे लग्न (Second

Mouni Roy: मला सगळ्यांना सांगायचं की मी गे... अभिनेत्री मौनी रॉयची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती सूरज