शिर्डीच्या साई संस्थान मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस तपास सुरू

शिर्डी : शिर्डीच्या साई संस्थान मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने ई मेल करुन ही धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

शिर्डीच्या साईबाबांचे जगभर लाखो भक्त आहेत. हे भक्त शिर्डीत साई संस्थान मंदिरात येऊन साईबाबांना पाया पडणे पसंत करतात. दररोज शिर्डीच्या साई संस्थान मंदिरात भाविकांची रिघ लागलेली असते. महत्त्वाच्या दिवशी साईचरणी लीन होण्यासाठी लाखो भक्त येतात. यामुळे मंदिरासाठी कायमस्वरुपी बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. शिफ्ट ड्युटी स्वरुपात २४ तास आठवड्याचे सातही दिवस मंदिराचे संरक्षण केले जाते. पण धमकीला ई मेल आल्यामुळे सुरक्षा रक्षकांचा ताफा आणि शिर्डी पोलीस यांच्या कामात वाढ झाली आहे.

इ मेल नेमका कोणी केला याचा तपास सुरू आहे. मंदिराच्या बंदोबस्ताचा अधिकाऱ्यांनी नव्याने आढावा घेतला आणि तो आणखी चोख केला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस इ मेल नेमका कोणी केला याचा शोध घेत आहेत. संपूर्ण मंदिरात तसेच मंदिराबाहेर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. संशयास्पद हालचाल आढळल्यास सुरक्षा रक्षक लगेच घटनास्थळी जाऊन तपासणी करत आहेत. संपूर्ण मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या

'जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र आणि राज्य शासनात सामंजस्य करार

- मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यातील प्रत्येक ग्राम