10th Board Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा शुल्कात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी १०वी आणि १२वीच्या परीक्षा घेतल्या जातात. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जातात. यामुळे १०वी किंवा १२वीत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक सतत दबावात असतात. यशस्वी होऊ का असा प्रश्न त्यांना सतावत असतो. तर अशा चिंतेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या परीक्षेच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.


दहावीच्या २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षासाठी ५२० रुपये परीक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय झाला आहे. याआधी २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देत असलेल्यांसाठी परीक्षा शुल्क ४७० रुपये होते. यामुळे २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षात पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देत असलेल्यांना आधीच्या वर्षाच्या तुलनेत परीक्षा शुल्क म्हणून जास्तीचे ५० रुपये मोजावे लागणार आहेत. परीक्षा शुल्कात थेट ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.



दहावीच्या परीक्षा शुल्कात ५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत झाला. यावर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत परीक्षा शुल्कवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता. या चर्चेनंतर निर्णय घेत फक्त परीक्षा शुल्कात वाढ झाली. इतर शुल्कांमध्ये जसे प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क व प्रमाणपत्र शुल्कात कोणताही बदल केला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर मिळणाऱ्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे लॅमिनेट स्वरूपात दिली जातात. यासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारले जात आहे, हे शुल्क देखील विद्यार्थ्यांकडूनच घेतले जाते. असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना

Extremely Severe Alert : मोबाईलवर ‘Extremely Severe Alert’! भारत सरकारची नवी आपत्ती सूचना प्रणाली चाचणी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : तुमचा फोन अचानक वाजला आहे का? तर घाबरू नका. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

Property Tax थकीत बिलाच्या रकमेवरील दंड २ टक्क्यांऐवजी १ टक्का ?

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले संकेत मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांना महापालिकेच्यावतीने