सोनू निगम विरोधात FIR, पहलगामच्या मुद्यावर बोलणं भोवलं

मुंबई : गायक सोनू निगम विरोधात आलेल्या तक्रारीआधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला आहे. कानडी लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार सोनू निगम विरोधात पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.


कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे एका कार्यक्रमात सोनू निगम गाणी गात होता. यावेळी एका तरुणाने कानडी कानडी असं बोलायला सुरुवात केली. गायक सोनूने कानडी भाषेतले एखादे गाणे सादर करावे, अशी मागणी प्रेक्षकांमधून करण्यात आली होती. पण सोनूने वेगळाच अर्थ घेतला. यानंतर तो जे काही बोलला त्यामुळे कानडी नागरिकांच्या भावना दुखावल्या, अशी तक्रार कर्नाटक रक्षण वेदिके अर्थात केआरव्हीच्या बंगळुरू युनिटने पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला आहे.


वेळेत कार्यक्रम सादर करण्यासाठी निश्चित असे नियोजन असते. पण तरुण प्रेक्षकाने आयत्यावेळी कानडी गाण्याचा आग्रह धरला. यावर बोलताना तरुण ज्या पद्धतीने बोलत आहे ती पद्धत मला आवडलेली नाही, असे सांगत सोनू निगमने नाराजी व्यक्त केली. समोर कोण उभं आहे ते पहा. मला कनडी माणसं आवडतात. माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण हे असं वागू नका. मागणी करणाऱ्या प्रेक्षकाच्या जन्माच्या आधीपासूनच मी कानडी गाणी गात आहे. पण प्रेक्षकाचे हे वर्तन मला आवडलेले नाही. पहलगाममध्ये जे घडले त्याला हेच कारण आहे, असं सोनू निगम म्हणाला.


गायक सोनू निगमच्या या वक्तव्याच्या विरोधात पोलिसांकडे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. एका सांस्कृतिक मागणीला दहशतवादी घटनेशी जोडून गायक सोनू निगमने कानडी समाजाला असहिष्णु म्हटले आहे. या प्रकारांमुळेच भाषिक संघर्ष वाढत असल्याचे मत कर्नाटक रक्षण वेदिकेने व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष