अजंठा बोट सेवा ठप्प! हवामानाचा फटका की नियोजनाचा अभाव?

हवामानात बदल आणि जलवाहतुकीचा गोंधळ!


गेटवे टू मांडवा जलमार्गावर प्रवाशांचे हाल


अलिबाग : शनिवारच्या दुपारी ४ वाजल्यानंतर हवामानात अचानक बदल झाला आणि गेटवे-मांडवा जलमार्गावरील अजंठा कंपनीच्या बोटींची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्यात आली. यामुळे अलिबागकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची मात्र मोठी तारांबळ उडाली.


उन्हाळी सुट्टी, शनिवार-रविवारचा दिवस, त्यात बोटी बंद असल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करत ताटकळत बसण्याची वेळ आली.



मात्र मालदार व पीएनपी या कंपन्यांच्या बोटी दर दोन तासांनी सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे या बोटींवर प्रवाशांची विशेष गर्दी झाल्याचं दिसून आलं.


गर्दीचा अंदाज घेता, पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले.


दरम्यान, हवामानाच्या चटकन बदलणाऱ्या स्थितीमुळे प्रवाशांना अचानक फटका बसण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी हवामान व जलवाहतूक अपडेटची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार

मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय