अजंठा बोट सेवा ठप्प! हवामानाचा फटका की नियोजनाचा अभाव?

हवामानात बदल आणि जलवाहतुकीचा गोंधळ!


गेटवे टू मांडवा जलमार्गावर प्रवाशांचे हाल


अलिबाग : शनिवारच्या दुपारी ४ वाजल्यानंतर हवामानात अचानक बदल झाला आणि गेटवे-मांडवा जलमार्गावरील अजंठा कंपनीच्या बोटींची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्यात आली. यामुळे अलिबागकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची मात्र मोठी तारांबळ उडाली.


उन्हाळी सुट्टी, शनिवार-रविवारचा दिवस, त्यात बोटी बंद असल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करत ताटकळत बसण्याची वेळ आली.



मात्र मालदार व पीएनपी या कंपन्यांच्या बोटी दर दोन तासांनी सुरू असल्याने काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे या बोटींवर प्रवाशांची विशेष गर्दी झाल्याचं दिसून आलं.


गर्दीचा अंदाज घेता, पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले.


दरम्यान, हवामानाच्या चटकन बदलणाऱ्या स्थितीमुळे प्रवाशांना अचानक फटका बसण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी हवामान व जलवाहतूक अपडेटची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Bhigwan Crime : "तो व्हिडिओ म्हणजे दबावाचा खेळ!"; आमदार गोपीचंद पडळकरांचा भिगवण अपहरण प्रकरणात खळबळजनक आरोप

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये मंगळवारी भरदिवसा एका तरुणीचे फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याच्या घटनेने

शिवजयंतीनिमित्त पुण्याच्या वाहतुकीत होणार 'हे' महत्वाचे बदल

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी

Bhigwan kidnapping girl video : भिगवण अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण; डोळ्यात तिखट टाकून पळवल्याचा बनाव, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल!

पुणे : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या एका 'अपहरण' नाट्याने

Nacha Danana Marathi Song : ‘नाचा दणाना’वर थिरकणार संपूर्ण महाराष्ट्र!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे

आयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

मुंबई: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील दोन लाख

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

मुंबई: राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने