हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची हत्या, आठ जणांना अटक

मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरू येथे चाकूने भोसकून हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. हत्येप्रकरणी मारेकरी शोधण्यासाठी तपास सुरू आहे.


पोलिसांनी मारेकरी शोधण्यासाठी पाच पथके तयार करुन तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. हत्येप्रकरणी अटकेतील संशयितांची चौकशी सुरू आहे. ज्या भागात हत्या झाली त्या भागातील जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज मागवण्यात आले आहे. हे फूटेज तपासाचा भाग म्हणून तज्ज्ञांच्या उपस्थितीत बारकाईने बघितले जात आहे.


आठवड्याभरापूर्वी पोलिसांनी सुहास शेट्टीला स्वतःसोबत शस्त्र बाळगू नकोस असे सांगितले होते. यानंततर सुहासने स्वतःसोबत शस्त्र बाळगणे थांबवले. या घटनेला आठवडा होत नाहीत तोच मारेकऱ्यांनी सुहास शेट्टीवर चाकूने हल्ला केला. जेव्हा घटना घडली त्यावेळी सुहास शेट्टी निःशस्त्र होता, असे त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पोलीस दलात तसेच सुहास शेट्टीच्या भोवताली त्याचे शत्रू आहेत का याचाही तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


केंद्र सरकारच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि मंगळुरूचे भाजप खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा यांनी हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे अर्थात एनआयएकडे तपासाकरिता द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी सुहास शेट्टीच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.


पोलिसांनी सुहास शेट्टीच्या मारेकऱ्यांना अटक केली नाही तर बदल्याच्या भावनेतून एकमेकांवर हल्ले करण्याचे आणि खून करण्याचे प्रकार वाढण्याचा धोका भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन