हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची हत्या, आठ जणांना अटक

  91

मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरू येथे चाकूने भोसकून हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. हत्येप्रकरणी मारेकरी शोधण्यासाठी तपास सुरू आहे.


पोलिसांनी मारेकरी शोधण्यासाठी पाच पथके तयार करुन तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. हत्येप्रकरणी अटकेतील संशयितांची चौकशी सुरू आहे. ज्या भागात हत्या झाली त्या भागातील जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज मागवण्यात आले आहे. हे फूटेज तपासाचा भाग म्हणून तज्ज्ञांच्या उपस्थितीत बारकाईने बघितले जात आहे.


आठवड्याभरापूर्वी पोलिसांनी सुहास शेट्टीला स्वतःसोबत शस्त्र बाळगू नकोस असे सांगितले होते. यानंततर सुहासने स्वतःसोबत शस्त्र बाळगणे थांबवले. या घटनेला आठवडा होत नाहीत तोच मारेकऱ्यांनी सुहास शेट्टीवर चाकूने हल्ला केला. जेव्हा घटना घडली त्यावेळी सुहास शेट्टी निःशस्त्र होता, असे त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पोलीस दलात तसेच सुहास शेट्टीच्या भोवताली त्याचे शत्रू आहेत का याचाही तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


केंद्र सरकारच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि मंगळुरूचे भाजप खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा यांनी हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे अर्थात एनआयएकडे तपासाकरिता द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी सुहास शेट्टीच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.


पोलिसांनी सुहास शेट्टीच्या मारेकऱ्यांना अटक केली नाही तर बदल्याच्या भावनेतून एकमेकांवर हल्ले करण्याचे आणि खून करण्याचे प्रकार वाढण्याचा धोका भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला