हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची हत्या, आठ जणांना अटक

मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरू येथे चाकूने भोसकून हिंदुत्ववादी नेता सुहास शेट्टीची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. हत्येप्रकरणी मारेकरी शोधण्यासाठी तपास सुरू आहे.


पोलिसांनी मारेकरी शोधण्यासाठी पाच पथके तयार करुन तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. हत्येप्रकरणी अटकेतील संशयितांची चौकशी सुरू आहे. ज्या भागात हत्या झाली त्या भागातील जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज मागवण्यात आले आहे. हे फूटेज तपासाचा भाग म्हणून तज्ज्ञांच्या उपस्थितीत बारकाईने बघितले जात आहे.


आठवड्याभरापूर्वी पोलिसांनी सुहास शेट्टीला स्वतःसोबत शस्त्र बाळगू नकोस असे सांगितले होते. यानंततर सुहासने स्वतःसोबत शस्त्र बाळगणे थांबवले. या घटनेला आठवडा होत नाहीत तोच मारेकऱ्यांनी सुहास शेट्टीवर चाकूने हल्ला केला. जेव्हा घटना घडली त्यावेळी सुहास शेट्टी निःशस्त्र होता, असे त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पोलीस दलात तसेच सुहास शेट्टीच्या भोवताली त्याचे शत्रू आहेत का याचाही तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


केंद्र सरकारच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि मंगळुरूचे भाजप खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा यांनी हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे अर्थात एनआयएकडे तपासाकरिता द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी सुहास शेट्टीच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.


पोलिसांनी सुहास शेट्टीच्या मारेकऱ्यांना अटक केली नाही तर बदल्याच्या भावनेतून एकमेकांवर हल्ले करण्याचे आणि खून करण्याचे प्रकार वाढण्याचा धोका भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या