... म्हणून फुटले ७० हजाराचे हेल्मेट, अपघाताच्या धक्कादायक फुटेजने सर्वकाही झाले उघड

कोल्हापूर: कोल्हापूरचे प्रसिद्ध बिल्डर विलास रेडेकर यांचा २३ वर्षीय मुलगा सिद्धेश रेडेकर (Kolhapur Bike Rider Accident) याचा दिनांक २० एप्रिल रोजी आजरा-आंबोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले. तब्बल 12 लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावरती 70 हजाराचे अत्याधुनिक हेल्मेट असताना सुद्धा त्याला जीव गमवावा लागला. ज्याचे फुटेज आता समोर आले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघाताचे संभाव्य कारण बाईकची वेगवान गती असल्याचे दिसून आले आहे. सिद्धेशच्या हेल्मेटमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्याने टिपलेले फुटेज हे या घटनेचे भीषण वास्तव मांडते. या फुटेजमध्ये, सिद्धेश जीवघेणा अपघात होण्यापूर्वी दोनदा हँडलबार सोडताना दिसतो, तरी देखील सिद्धेशच्या बाईकचा वेग काही कमी झाला नाही.

अपघातापूर्वी काय झाले? कॅमेऱ्यात झाले कैद


या भयानक फुटेजमध्ये अपघातापूर्वीच्या क्षणांबद्दल महत्त्वपूर्ण तपशील हाती आला आहे. या हेल्मेट कॅमेऱ्यामधील व्हिडिओ फुटेज आता व्हायरल झाले असून अपघात कसा झालाय हे यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. अपघातापूर्वी त्याच्या दुचाकीची गती प्रतितास १४२ किलोमीटर होती.

 



दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गाडीचा वेगच मृत्यूला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. या अपघातामध्ये बारा लाखांच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. हेल्मेट सुद्धा फुटलं होतं.

कसा झाला अपघात?


सिद्धार्थ बायकर्स असल्याने नेहमीच त्याला दूरवर प्रवास करण्याची सवय होती. त्याप्रमाणे सिद्धार्थ रेडेकर आपल्याचार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता. कोल्हापुरातून सकाळी सहा वाजता ते निघाले होते. दरम्यन आंबोली घाटातील विविध ठिकाणी भेटी दिल्यांनतर सकाळी 11 वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेमध्ये त्याच्या हाताला छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाली.

70 हजाराच्या हेल्मेटचे झाले तुकडे


या अपघातामध्ये सिद्धेशच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले, या अपघातामध्ये त्याच्या छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने गडहिंग्लजमध्ये खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक